वृत्तसंस्था/ ओस्जेक
क्रोएशियात सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचे नेमबाज सौरभ चौधरी आणि मनू भाकर यांनी 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजीत रौप्यपदक पटकाविले.
यापूर्वी झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनू भाकर यांनी पाच सुवर्णपदके मिळविली होती. या स्पर्धेत 10 मी. एअर पिस्तुल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारातील मनू आणि सौरभ यांचे हे सहावे पदक आहे. या क्रीडा प्रकारात रशियाच्या बॅटसेराशिकीना आणि चेर्नोसोव्ह यांनी सुवर्णपदक मिळविले. तर भारताच्या देस्वाल आणि अभिषेक वर्मा यांचे कास्यपदक थोडक्यात चुकले.
या स्पर्धेत भारताच्या रायफल नेमबाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या पुरूष आणि महिला नेमबाजांना 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नाही. भारताने आतापर्यंत तीन पदकांची कमाई केली आहे. पदकतक्त्यात रशिया तीन सुवर्णासह एकूण 7 पदके घेत आघाडीचे स्थान घेतले आहे.