ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि एनआरसी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
या भेटीनंतर बोलताना ममता म्हणाल्या, मी पंतप्रधान मोदींना सीएए, एनआरसी व एनपीआरच्या विरोधात असल्याचे सांगितले आहे. तसेच, हा निर्णय मागे घ्यावा असेही म्हटले आहे. त्याचबरोबर काही आर्थिक मुद्यांवरही पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली.
या भेटीनंतर ममता यांनी लगेचच तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संगठनेकडून सीसीए विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यावेळी त्या म्हणाल्या, सीसीए कायदा केवळ कागदावरच राहील. आम्ही कदापी हा कायदा येथे लागू करण्यास सहमती देणार नाही.