विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची साताऱयात फटकेबाजी ; शिवसेनेची फरफट सुरु : शेतकरी आंदोलनाचा बोलवता धनी वेगळा : कोरोना लसीबाबत राजकारण थांबावावे
प्रतिनिधी / सातारा
सध्या शिवसेनेची फरफट सुरू असून विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांची असलेली जागा गेली पण भाजपला आपले यश मिळवता आले आहे, अशी टिप्पणी करत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणप्रश्नी सरकार भांबावून गेले आहे. आता आम्हाला सरकारच्या भूमिकेवर संशय येतो, अशी शंका व्यक्त करत त्यांनी शेतकरी आंदोलनाचा बोलवता धनी वेगळा आहे, असे परखड मत व्यक्त केले. दरम्यान, भाजपचे कोणीही आमदार सोडून जाणार नाही, अजित पवारांनी शिवेंद्रराजेंना मदत करणे काहीच गैर नाही, असे सांगत त्यांनी राजकीय फटकेबाजीही केली.
चिंचणेर निंब (ता.सातारा) येथील हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबाचे सात्वंन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी सातारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, गणेश पालखे उपस्थित होते.
दरेकर कोरोना लसीबाबत सुरु असलेल्या चर्चेबाबत म्हणाले, अशा वेळेला जातीपातीच्या धर्माच्या पलिकडे एक आपत्ती म्हणून पाहिले पाहिजे. ज्या ठिकाणी आरोग्य हा विषय येतो. लसीची अंत्यत आवश्यकता आहे. आपल्या जीवापेक्षा काही मोठे नाही. कुठल्याही समाजाने अशा प्रकारचा वाद करण निरर्थक आहे. मुस्लिम समाजाने तर वाद करु नये. शेवटी आज लोकांचे जीव महत्वाचे आहेत. शिवसमर्थ शिल्पाच्या वादावर ते म्हणाले, आपली दैवत असतील, संत असतील, त्यांचे पुतळे चौकात उभे करुन त्यांच्या स्मृती जागवण्याचे काम करत असतो आणि त्या मागे प्रेरणा आणि स्फुर्ती मिळत असते. अशा प्रकारे विरोध करणे योग्य नाही, असे सांगितले.
भाजपचा कोणीही आमदार फुटणार नाही
गाठीभेटीवरुन कोण फुटणार जाणार आहे असा अर्थ काढत असाल तर अंत्यत चुकीचा आहे. भेटीगाठी राजकारणात होत असतात. मी आज अंत्यत दाव्याने सांगतो. भाजपाचा एकही आमदार फुटायचे काही कारण नाही. फुटणार नाही. इतर पक्षातून जे आलेत त्यांनी स्पष्ट दोन दिवसांपूर्वी गणेश नाईकांनी सांगितले. शिवेंद्रराजे, सगळय़ांनी सांगितले. कोठेही कोण जाणार नाही. थोडे दिवस वाट बघा, येणाऱया काळात कोण कोठे जाते ते. ज्या पक्षाला नरेंद्र मोदींसारख एक प्रभावी नेतृत्व आहे. त्या पक्षातून जायचं कारण काय?, दिर्घकाळ टिकणाऱया राजकारणाच्या व पक्षाच्या मागे राहण्याचे भान प्रत्येक आमदार किंवा नेत्याला नक्की आहे.ख
मतदार यादीतील घोळाबाबत जिल्हाधिकाऱयांना सूचना
मतदार याद्यांचा घोळ महाबळेश्वरवरुन येताना आमच्या कार्यकर्त्यांनी हीच तक्रघ्र केली. जिल्हाधिकाऱयांनी जी यादी दिली होती. ती योग्य होती. नंतर तहसीलदार यांनी दुसरी यादी करुन जे त्या ग्रामपंचायतीच्या वॉर्डात येत नाहीत. अशा दुसऱया लोकांची नावे त्या वॉर्डात आलेली आहेत. मी कलेक्टरांना सांगितलेले आहे की तात्काळ या प्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या आहेत.
शेतकरी आंदोलनामागील बोलावता धनी वेगळा
मराठा आरक्षण प्रश्नी पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मराठा आरक्षण सरकारने द्यायला हवे होते. कोर्टाची बाजू समजून घ्यायला हवी होती. तसे न करता सरकार पुरते भांबावून गेले आहे. सरकारची भूमिका संशयास्पद आहे. मराठा समजाच्या सवलती एका बाजूला बंद करत आहे. मराठा समाजाचा आक्रोश सरकार थांबवू शकत नाही, ही शोकांतिका आहे, असे सांगत शेतकरी हिताचे तीन कायदे असूनही या कायद्याबाबत चुकीचे मत तयार केले जात आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या कायद्याबाबत सखोल माहिती दिली आहे. शेतकरी आंदोलनाच्या मागचा बोलवता धनी वेगळा आहे, असे सांगितले.