उच्च न्यायालयाचा अवमान प्रकरणी मंत्री अशोक चव्हाण यांचेवर कारवाई करावी
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षण प्रश्नी सरकारमधील कोणाचाही अभ्यास नसल्याने गुंता वाढत आहे. असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 102 व्या घटना दुरुस्ती नंतर कायदा करता येत नाही. असा मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांचा आक्षेप असेल तर ते सर्वांवरच आक्षेप घेत आहेत. त्याचे हे वक्तव्य उच्च न्यायालयाचा अवमान करणारे असल्याने त्यांचेवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत जे ओबीसींना तेच मराठÎांना हा निकष लावण्यात यावा, अशी मागणी केली. मराठा समाजाला विश्वासात घेऊन नोकरभरती करा अन्यथा उद्रेक होईल असा इशारही त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयातील मंगळवारच्या सुनावणी नंतर ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, गायकवाड आयोग घटनेच्या चौकटीत बसवून स्थापन केला. या आयोगाने राज्यातील पाच लाख लोकांचा सर्व्हे करुन मराठा समाज मागास असल्याचे समोर आणले. हा अहवाल विधानसभेत एकमताने मान्य झाला, राज्यपालांची सही झाली. न्यायालयानेही मान्य केले. असाधारण स्थीतीत उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केले. सर्वोच्च न्यायालयातही भाजप सरकार सत्तेवर असतान स्थगिती मिळाली नव्हती. बाजू मांडण्यास आघाडी सरकार कुठेतरी कमी पडले म्हणून आता स्थगिती मिळाली आहे. अशी टीका पाटील यांनी केली.
ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात आता दररोज सुनावणी सुरु आहे.
मात्र कधी निकाल येईल हे सांगता येत नाही. तेव्हा सरकारने मराठा समाजाला आधार दिला पाहिजे. शैक्षणिक परिक्षा, नोकरभरती अजून किती वेळ लांबवणीवर टाकरणार खुल्या गटातून जे मराठा विद्यार्थी परिक्षा किंवा नोकरीसाठी अर्ज करणार आहेत. किंवा केलेले आहेत. त्यांच्यावर अन्याय होईल वय निघून जाण्याची भीती त्यांच्यामध्ये आहे. यावर मार्ग काढण्यासाठी सरकारने प्रमुख मराठा संघटनांशी चर्चा केली पाहिजे. काही प्रमाणात जागा वाढवून मार्ग काढा असा सल्ला दिला. हातात हात घालून या प्रश्नावर काम करण्याची आमची तयारी आहे. पण सरकार आम्हाला बोलवत नाही. अशी टिका पाटील यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही त्यांनी सडकून टिका केली. शैक्षणिका विषयावर मराठा समाजाला किती गुण पडले हे त्यांनी जाहीर करण्याचे अव्हान केले. मराठा समाजाला विश्वासात घेऊन नोकरभरती करा अन्यथा उद्रेक होईल असा इशारही त्यांनी दिला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
आरक्षणामुळे नावामागे मागास लागण्याची बड्या मराठ्यांना भीती
पिंपळगावमधील आंदोलन जबरदस्ती करुन संपवू नका
राज्यपालांचा अवमान करणाऱया घटना इतिहासात पहिल्यांदाच
विधानसभा अध्यक्ष मतदान घेतले असते तर किती सोबत असते कळले असते.
कृत्रिमपणे तीन पक्ष एकत्र
वझे प्रकरण मुळापर्यंत खणून काढण्यात यश येईल
नाना पटोले स्वत:चे हसे करुन घेत आहेत.
आणखी एक मंत्री राजीनामा देतील