ऑनलाईन/टीम
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजाला मोठा धक्का बसला होता. यानंतर मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला. नंतर केंद्राने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. पण कोर्टाने ती फेटाळून लावली. यांनतर मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. पण घेतलेला कालावधी पूर्ण होऊन देखील अद्यापही मागण्यांची पूर्तता झालेली नसल्याने खासदार संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. मान्य झालेल्या मागण्यासंबंधी एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याने संभाजीराजेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहिलं असून आपली नाराजी जाहीर केली आहे. संभाजीराजेंनी ट्विटरला हे पत्र शेअर केलं आहे.
“मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. मात्र एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही,” असं यावेळी संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
खासदार संभाजीराजे यांचं ठाकरे सरकारला पत्र