नवी दिल्ली/प्रतिनिधी
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं असून राज्य सरकारचा कायदा रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारण्यात आल्या आहेत. यावेळी सुप्रीम कोर्टाने आरक्षण देणं शक्य नसल्याचं म्हंटल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्याम, ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय प्रवेश सुप्रीम कोर्टाने वैध ठरविले आहेत.
दरम्यान मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक सुरु झाली आहे.