मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : रविवारी जिह्यातून 200 गाडया जाणार : तयारी सुरु : गाडी मोर्चाने मुंबईच्या सीमा लॉक करण्याचे नियोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत सुनावणी पुढे ढकलली. याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारविरोधात मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (दि.14) मंत्रालयावर धडक देण्याची तयारी सुरु केली आहे. यावेळी गाडी मोर्चा काढून मुंबईच्या सीमा लॉक करण्याची रणनीती आखली जात आहे. सकल मराठा समाजातर्फे कोल्हापूर जिह्यातून सुमारे 200 चारचाकी नेण्याचे नियोजन सुरु आहे. आतापर्यंत 25 हून अधिक गाडÎांची नोंदणी झाली आहे. रविवारी (दि.13) कोल्हापूरातून आंदोलक कूच करणार आहेत.
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने स्थगितीच्या निर्णयापूर्वीच नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश थांबले आहेत. त्यामुळे मराठा विद्यार्थी व नियुक्ती झालेले उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यातच बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठविण्यास नकार देत सुनावणी 25 जानेवारीपासून नियमित करण्याचा निर्णय दिला. यामुळे मराठा समाजाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. याची परिणीती समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये राज्य सरकार कुठे तरी कमी पडले या भावनेतून मराठा समाज संघटनांनी रस्त्यावर येण्याची तयारी सुरु केली आहे. मंत्रालयाला घेराओ घालण्याबरोबरच मुंबईच्या सीमा बंद केल्या जाणार आहेत. गाडी मोर्चामध्ये राज्यभरातून गाडÎाभरुन मराठा आंदोलकांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन सुरु आहे. आमदार नितेश राणे यांनी या मोर्चा करीता राज्यभरासाठी 500 गाडÎांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हयासाठी ही यातील गाडÎा दिल्या जाणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन तोडकर यांच्या पुढाकाराने वाहनांची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या यंत्रणेमार्फत जिल्हयाच्या कानाकोपर्यातील मराठा आंदोलकांशी संपर्क साधला जात आहे. आतापर्यंत 23 हून अधिक गाडÎांची नेंदणी झाली आहे. जिह्यातून 200 हून अधिक गाडÎा जाण्याची शक्यता आहे.
सकल मराठाची टीम कार्यरत
यापूर्वी कोल्हापूरातून काढण्यात आलेल्या गाडी मोर्चा पेक्षा ही ताकदीने व व्यापक मोर्चा काढण्याची जोरदार तयारी सुरु आहे. यासाठी सकल मराठाचे दिलीप पाटील, उमेश निगडे, जयेश कदम, प्रा. जयंत पाटील, राजीव लिंग्रस आदींची टीम कार्यरत आहे.
वाशी येथे आंदोलकांच्या चहा नाश्त्याची सोय
मंत्रालयावर सोमवारी (दि.14) काढण्यात येणार्या गाडी मोर्चात राज्यभरातून मराठा समाजबांधव सहभागी होणार आहेत. त्यांच्या चहा नाश्त्याची सोय वाशी (मुंबई) येथे करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांनी पुढाकार घेतला आहे.
आंदोलनासाठी रेल्वे बुकींग
हे आंदोलन गाडी मोर्चापुरते मर्यादीत नाही. मराठा समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता सकल मराठा समाजातर्फे रेल्वेचेही बुकींग करण्यात आले आहे. त्याचबरोबर मराठा समाजबांधव ही आपल्या चारचाकी वाहनांसह उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभागी होणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा युध्द सुरु
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांनी पुन्हा एकदा युध्द पुकारले आहे. याची सुरुवात सोमवार (दि.14)पासून होणार आहे. राज्य सरकारने `एसईबीसी’आरक्षणातून शिक्षण प्रवेश व स्थगितीपूर्वी शासकिय विभागांमध्ये झालेल्या नियुक्तांबाबत तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागले. मराठा समाज आता थांबणार नाही. – सचिन तोडकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा