मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने केली नाक्यावर निदर्शने
प्रतिनिधी/ सातारा
कोपर्डीच्या ताईवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे मशाल वेगाने पेटली. अगदी त्यावेळी तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळले अशी स्थिती निर्माण झाली होती. 3 ऑक्टोबर 2016 ला साताऱयात विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर अनेक आंदोलने झाली होती. बुधवारी मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने मराठय़ांकरता दिलेले आरक्षण रद्द करण्यात आले. त्याचा निषेध साताऱयात पोवई नाक्यावर करण्यात आला.
3 ऑक्टोबर 2016 ला पोवई नाक्यावर विराट मोर्चा काढण्यात आला होता.शासनाने नेमलेल्या गायकवाड अहवालासमोर अनेक मराठय़ांनी उपस्थित राहून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आंदोलनामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल होते. आज मात्र उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला झटका देताच साताऱयातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पोवई नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी निदर्शने करुन आपला रोष व्यक्त केला. सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.
मराठा समाजाची तिसरी लाट उमटेल
मराठा आरक्षणाचा जो निर्णय झालेला आहे. त्यामुळे मराठा समाज खुप व्यतीथ झालेला आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय आहे तो शासनाने व्यवस्थीत बाजू न मांडल्याचे कारण आहे. आता जे कोव्हीडचे वातावरण आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरु शकत नाही असे त्यांना वाटते आहे. हे बरोबर आहे. मराठा समाज मोठा भाऊ म्हणून जबाबदारीने वावरतो. आता जरी मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही तरी भविष्यात तिसरी लाट जी असेल ती मराठा समाजाची उद्रेकाची लाट असेल. शासनाच्या धोरणानुसार तिसरी लाट उमटेल.
बापू क्षीरसागर मराठा समन्वयक
लोकांनी शांतता पाळावी
मराठा आरक्षण रद्द झाले आहे. हा कोर्टाचा निकाल आहे. लोकांनी शांतता पाळावी. सरकारने द्यायचे ते दिले होते. आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र शासनाने कायदा करुन आरक्षण द्यावे. सुप्रिम कोर्टाच्या तीन बेंचने दिलेला निकालात आरक्षण रद्द केले गेले आहे. आता राज्य सरकारने न्यायालयीन बाबी तपासून आरक्षण द्यावे.
संदीप पोळ याचिकाकर्ते
समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी निकाल
समाजाच्या दृष्टीने अंत्यत दुर्दैवी निकाल लागलेला आहे. निश्चितपणे समाज विरोधी पक्ष आणि सताधारी यांचा योग्य वेळी योग्य परफेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसणार नाही. याला जबाबदार मागचे भाजपा सरकार आणि विद्यमान महाविकास आघाडी सरकार असे दोन्ही सरकार आहेत. भाजपा सरकारने त्यावेळी कायद्याच्या कसोटीत टिकणारे आरक्षण देणे आवश्यक होते. 50 टक्याच्या वरचे आरक्षण देवून मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे.
विवेकानंद बाबर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक
मराठा समाजावर अन्याय
ज्या मराठय़ांनी अखंड हिंदूस्थान अखंड ठेवण्याचे काम केले. त्यांच्यावर आज अन्याय होत आहे. समाजात गैरसमज आहेत. ते म्हणजे हा मराठा समाज सदन आणि समृद्द आहे. पण प्रत्यक्षात वास्तव वेगळेच आहे. हे वास्तव न्यायालयापर्यंत पोहचवणे आणि न्यायालयाने वस्तूस्थितीची माहिती घेवून निर्णय देणे अपेक्षित असते. हा निर्णय कोणत्या एका व्यक्तीगत पातळीवर परिणामकारक ठरणारा नाही तर मराठा समाजावर परिणाम करणारा आहे.
राजेंद्र चोरगे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक