राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
मराठा समाजासाठी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र या प्राधिकरणाला ‘श्री छत्रपती शिवाजी मराठा विकास प्राधिकरण’ असे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे 5 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. त्यामध्ये मराठा समाजासाठी किमान 10 टक्के निधी राखीव ठेवावा. हा निधी मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी खर्च करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
मराठा समाजामध्ये जवळपास 96 उपजाती येतात. त्या सर्वांचा विकास या निधीतून करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे. मराठा समाजातील काही उपजाती या अत्यंत मागासलेल्या आहेत. त्यांच्यासाठी या निधीचा वापर होणे गरजेचे आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या विकास प्राधिकरणाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, मुनीर लतिफ, दुर्गेश मंत्री, के. जी. पाटील, अमोल देसाई, संजय कोलकार, शिवाजी लाड, धनपा अक्षीमनी, जोतिबा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.