प्रतिनिधी /बेळगाव
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये 1971 साली झालेल्या युद्धामध्ये हुतात्मा झालेल्या तसेच देशासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी आदरांजली अर्पण करून स्मृतीला अभिवादन केले. येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये शुक्रवारी सकाळी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानविरोधी युद्धात विजय मिळविला होता. हा दिवस इन्फंट्रीतर्फे स्वर्णिम विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना आणि नुकतेच अपघाती मृत्यू पावलेले सीडीएस बिपिन रावत यांना तसेच अन्य अधिकाऱयांना किरण ठाकुर यांनी आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या समवेत लोकमान्य सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, कर्नल दीपक गुरूंग, समन्वयक विनायक जाधव उपस्थित होते.