खानापुरात म. ए. समितीच्या बैठकीत दोन्ही गटातील एकीबाबत चर्चा : मतभेद-स्वार्थ बाजूला ठेवून एकी करण्याचे आवाहन
वार्ताहर / खानापूर
गेल्या अनेक वर्षापासून सीमा प्रश्नाची चळवळ व न्यायालयीन लढा अत्यंत महत्त्वाचा आहे. सीमाप्रश्न व न्यायालयीन लढय़ाला ताकत मिळण्यासाठी मराठी माणसात एकी राहणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षात म. ए. समितीमध्ये दुहीचे राजकारण झाले. परंतु वेळोवेळी ते सामोपचाराने तोडगा काढून मिटवण्यात आले. खानापूर तालुक्मयात देखील गेल्या पाच वर्षात फूट पडलेली आहे. त्यामुळे म. ए. समिती एकीच्या झेंडय़ाखाली आणण्यासाठी दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपले मतभेद व स्वार्थ बाजूला ठेवून एकी राखावी, एकीसाठी दुसऱया गटाकडे केलेल्या एकाच प्रस्तावातून निर्णय होणे शक्मय नाही. झाल्यास पुन्हा पुन्हा प्रस्ताव ठेवून एकी साधण्याचा प्रयत्न करणे किंवा एका त्रयस्थ कमिटीची रचना करून खानापूर तालुका म. ए. समिती एकीच्या झेंडय़ाखाली आणावी व आगामी निवडणुकीत मराठी माणसाने एकसंघता राखावी असे विचार तालुका म. ए. समिती कार्यकारिणी सदस्य व माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार यांनी मांडले. गुरुवारी खानापूर शिवस्मारकात आयोजित तालुका म. ए. समिती कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते.
उपस्थितांचे स्वागत चिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. बैठकीत प्रामुख्याने सीमाप्रश्न व खानापूर तालुक्मयात निर्माण झालेल्या दोन गटात एकी करण्यावरून चर्चा करण्यात आली. मागील बैठकीमध्ये एकीचा प्रस्ताव पुढे करून दोन्ही गटांनी एकत्र यावे असे आवाहन केले होते. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली म. ए. समितीची नव्याने रचना करण्याचा प्रस्ताव करून दुसऱया गटातील समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांच्याकडे पत्राद्वारे एकीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु दीड महिना उलटला तरी त्या गटाने एकीसंदर्भात कोणतेही उत्तर दिले नाही. यामुळे बैठकीत पुढील निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य प्रकाश चव्हाण म्हणाले, मुरलीधर पाटील, सुर्याजी पाटील, विवेक गिरी आदींनी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीने एकीचा प्रस्ताव देवाप्पा गुरव यांच्याकडे पत्राद्वारे ठेवला आहे. परंतु त्या गटाने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्या गटाला एकीसाठी आवाहन करण्यापेक्षा आपल्या संघटनेच्या माध्यमातून खानापूर तालुक्मयात पुन्हा एकदा जोमाने कामाला लागून समितीच्या ध्येय धोरणाविषयी व आपल्या भूमिकेविषयी मराठी माणसात जागृतता निर्माण करुन आगामी निवडणुका अथवा संघटनेचे कामकाज जोमाने करण्याचे विचार मांडले.
आम्हालाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची इच्छा
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, म. ए. समितीच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संघटनात्मक काम करत लढा देत आलो आहोत. सीमाप्रश्नाच्या तत्त्वानुसार काम करताना समितीतील ज्ये÷ांनी आपल्याला दिलेली नैतिक जबाबदारी स्वीकारून समितीचा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे जाताना आम्हालाही सर्वांना घेऊन जाण्याची इच्छा आहे. परंतु मागील निवडणुकीत स्वार्थासाठी माजी आमदार अरविंद पाटलांनी गट करून वेगळी समिती स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समितीची नाहक हार झाली. हे पुन्हा घडू नये, यासाठी मागे घडलेल्या गोष्टी बाजूला ठेवून एकीचा प्रस्ताव त्या गटाच्या समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांच्याकडे पत्राद्वारे केला. परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. तरीही या समितीत सामील होण्यासाठी आपली दारे कायम उघडी ठेवली असल्याचे विचार त्यांनी यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले. बैठकीत म. ए. समितीने आतापर्यंत सीमा प्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्याच्या पत्रांचा दस्तावेज एकत्रित करून तो अबाधित राहावा असा ठराव करण्यात आला.
स्नेहल गिरी यांच्या अभिनंदनाचा ठराव
खानापूरची कन्या स्नेहल गिरी हिने एमएससी व पीएचडी करून तालुक्मयाचे नाव उज्ज्वल केले आहे. याबद्दल तिच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत केला
बैठकीला माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, लक्ष्मण कसार्लेकर, माजी ता. पं. सदस्य रमेश पाटील, अमृत पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, डी एम भोसले, मरु पाटील, ईश्वर बोभाटे, कृष्णा मनोळकरसह अनेक जण उपस्थित होते. माजी ता, पं. सदस्य महादेव घाडी यांनी आभार मानले.