मराठीत परिपत्रके देण्यासाठी म. ए. समितीचे ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागामध्ये 25 लाखांहून अधिक मराठी भाषिक एकत्र राहतात. या मराठी भाषिकांना मराठीत परिपत्रके उपलब्ध करून देणे हे कर्नाटक सरकारचे काम आहे. न्यायालयाने याबाबत आदेश दिला आहे. तसेच स्वतः सरकारनेही मराठीत परिपत्रके देण्याबाबत आदेश काढला होता. मात्र, तो आदेश अचानकपणे मागे घेऊन मराठी भाषिकांची गळचेपी सुरू केली आहे. त्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.
अल्पसंख्याक आयोगाने सीमाभागातील मराठी भाषिकांना आणि उर्दू भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून परिपत्रके उपलब्ध करा, असे आदेश अनेकवेळा दिले आहेत. उच्च न्यायालयानेही सरकारला याबाबत आदेश दिले होते. मात्र, हे आदेश पायदळी तुडवून सीमाभागामध्ये कन्नड सक्ती तीव्र करण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात आला आहे. कायद्यानुसार 15 टक्क्मयांपेक्षा अधिक भाषिक एकत्र असतील तर त्यांना त्यांच्या मातृभाषेतून परिपत्रके उपलब्ध करणे हे बंधनकारक आहे. मात्र, जाणूनबुजून सीमाभागामध्ये ही परिपत्रके दिली जात नाहीत.
यापूर्वी दोनवेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, त्यानंतरही केवळ वेळकाढूपणा करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दमदार पावसामध्येही मराठी भाषिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग दर्शवून आपली मागणी मांडली आहे. शहराबरोबरच बेळगाव तालुक्मयातील तसेच खानापूर तालुक्मयातील आणि सीमाभागातील इतर भागातून कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे अनेक रस्ते बंद पडले होते. तरीदेखील कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी भाषिकांनी एकजुटीने आपली ताकद दाखवून दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. भर पावसात तब्बल चार तासांहून काळ ठिय्या मारण्यात आला. त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, प्रकाश मरगाळे, युवा म. ए. समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, मालोजी अष्टेकर, मनोज पावशे, ऍड. सुधीर चव्हाण, मदन बामणे, आर. आय. पाटील, संतोष मंडलिक, माजी जि. प. सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, एस. एल. चौगुले, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, माला जाधव, श्रद्धा मंडोळकर, राजश्री बांबुळकर, राजश्री बंडमंजी, प्रिया कुडची, मंजुश्री कोलेकर, सुधा भातकांडे, कृष्णा हुंदरे, महादेव पाटील, गोपाल देसाई, संभाजी देसाई, पुंडलिक कारलगेकर, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, यशवंत बिर्जे, डी. एम. भोसले, नारायण कापोलकर, रामचंद्र मोदगेकर, नितीन खन्नुकर, शांताराम कुगजी, दुदाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर, येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, ग्रा. पं. उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, सदस्य दयानंद उघाडे, रमेश मेणसे, राकेश परिट, रुपा पुण्यान्नावर, परशराम परिट, मनीषा घाडी, शिवाजी नांदूरकर, प्रदीप देसाई, भोला पाखरे, राजू पावले, सुवर्णा बिजकरकर, अनसुया परिट, मधु पाटील, प्रकाश मालुचे, सतीश देसूरकर, मनोहर गिंडे, परशराम घाडी, जोतिबा चौगुले, वनिता परिट यांच्यासह तालुक्मयातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.