ऑनलाईन टीम
कोल्हापुरात होत असणाऱ्या मराठा मुक आंदोलनाचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे. तो दिल्लीपर्यंत पोहवण्याचा प्रयत्न असेल. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत ५८ मोर्चे काढले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला. त्यामुळे मराठा समाज नाराज झाला असून आक्रमक होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षणासाठी घटना दुरुस्तीचा विचार करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची या प्रश्नात महत्त्वाची भूमिका असून त्यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, असे आवाहन शाहू छत्रपती यांनी केले.
गेल्या काही काळात मराठा आरक्षणावरून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मराठा समाजाचा हा लढा सर्वांना सोबत घेऊन झाला पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. संभाजीराजेंनी त्यामुळेच या आंदोलनात लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या लढ्यासोबत आहे. त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करावी. तसेच केंद्र सरकारपर्यंत हा विषय पोहवण्यासाठी प्रयत्न करावेत. पतंप्रधान नरेंद्र मोदींची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट झालेली नाही. परंतु, आपला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असे शाहू महाराज म्हणाले.