ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाची लागण झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ‘मला माफ करा, मी हरलो…’ अशा आशयाचे एक भावनिक ट्विट केले आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, कोविड – 19 चा गोंधळ साधारण आठ ते दहा मार्च दरम्यान सुरू झाला. त्यावेळी मी माझ्या खात्याच्या मीटिंग मधून जनतेचे एस.आर.ए चे प्रश्न सोडवत होतो. त्यावेळी माझे कर्मचारी मला सांगायचे, साहेब.. तब्येतीची काळजी घ्या.. पण गोर गरीबांसाठी काम केले पाहिजे, ही साहेबांची शिकवण आणि माझ्यातील थोडासा अतिशहांपणा या मुळे मी काम करतच राहिलो. अगदी लॉक डाऊन ची घोषणा होईपर्यंत काम करत राहीलो. पण आता लॉक डाऊन मुळे लोकांना बाहेर पडणे अशक्य झाले आहे. आता अशा परिस्थित, या लढाईत काय करायचे.
दरम्यान, त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये आत्तापर्यंत केलेल्या विविध कामांचा उल्लेख केला आहे. चांगले-वाईट अनुभव सांगितले आहेत. पण आता सगळी माध्यम जितेंद्र आव्हाड कडे बोट दाखवतात तेव्हा मात्र माझे मन हरल्यासारखे झाले आहे असे म्हणत त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांना टॅग केले आहे.