ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या आणि पासपोर्ट हरविल्याने भारतात परतू न शकलेल्या हसीना बेगम (वय 65) यांना अठरा वर्षांपासून पाकच्या जेलमध्ये कैद करण्यात आले होते. अखेर औरंगाबाद पोलिसांच्या पाठपुराव्यांतर हसीना यांची पाकच्या कैदेतून सुटका झाली. त्यानंतर मंगळवारी त्या भारतात परतल्या.
हसीना या मूळच्या औरंगाबादच्या. मात्र, पाकिस्तानात नातेवाईकांना भेटून परतत असताना त्यांचा पासपोर्ट हरवला. त्यानंतर त्यांना पाकिस्तानात जबरदस्ती कैद करण्यात आले. हसीना यांच्या सुटकेसाठी औरंगाबाद पोलीस प्रयत्नशील होते. औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांचे अधिकृत घर असल्याचे पोलिसांनी पाकिस्तानला कळविले होते. अखेर पाकिस्तानच्या जेलमध्ये 18 वर्ष काढल्यानंतर त्या औरंगाबादेत परतल्या. मायदेशी आल्यावर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलिसांनी त्यांचे स्वागत गेले.
दरम्यान ‘भारतात परतल्यावर आपल्याला शांततेची जाणीव झाली. मला आता स्वर्गात आल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.’