सर्वसामान्य जनतेतून नाराजी ः ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांची बदली करण्यामागे अनधिकृत कामे न केल्याचे राजकारण ः आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
तालुका पंचायतीच्या मागील दीड वर्षांच्या कार्यकाळात तालुक्मयाचा विकास हाच ध्यास मनी ठेवून तसेच अनधिकृत कामे करणाऱयांवर करडी नजर ठेवणारे आणि कायद्यावर बोट ठेवून काम करणारे तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांची बदली झाली आहे. विकासाच्या गंगेत राजकारणाचा आगडोंब उसळण्याची ही पद्धत नवीनच आहे. मात्र, या राजकारणामुळे तालुक्मयाचा विकास खुंटणार यात शंका नाही. त्यामुळे त्यांची बदली करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ता. पं. चा महसूल वाढविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मोठे आहेत. नेहरुनगर येथे एका आस्थापनात अनधिकृतरित्या थाटलेली दुकाने बंद करून त्या ठिकाणी अधिकृत कामे करणाऱयांना व्यवसाय थाटण्यास परवानगी दिली. याचबरोबर ज्यांनी या ठिकाणी दुकाने थाटली आहेत त्यांचे थकीत भाडे घेऊन ते सरकारदरबारी जमा केले. अशा अनेक आस्थापनांची डागडुजी करून ती अनेकांना भाडेतत्त्वावर वापरण्यास देऊन तालुका पंचायतीचा महसूल वाढविला. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
हा सर्व प्रकार पाहून तालुक्मयातील सर्व तालुका पंचायत सदस्यांनी या अधिकाऱयांची बदली नको, असा ठराव केला. नेहरुनगर येथील आस्थापनातील अनधिकृतरित्या असणाऱया सर्वांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या या कामगिरीची वाहवा करण्यात आली. तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. याला सर्व सदस्यांनी टाळय़ा वाजवून संमतीही दिली. तालुका पंचायतच्या सर्वसाधारण सभांमध्ये मल्लिकार्जुन कलादगी यांची बदली होऊ नये यासाठी सर्व सदस्यांनी दोन वेळा ठराव मांडला. राजकारणी जर अशा प्रामाणिक अधिकाऱयांच्या बदलीसाठी प्रयत्न करीत असतील तर आम्ही सदस्य गप्प बसणार नाही, असे ठणकावून सांगितले.
कलादगी यांचे कार्य कौतुकास्पद
त्यांनी वर्षभरातच तालुक्मयातील अनेक विकासकामांना चालना दिली. उद्योग खात्री योजनेतून जी कामे राबविली आहेत आणि जलपातळी तसेच निसर्ग अबाधित राखण्यासाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. कामगारांना काम मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच राहिले. मात्र आता त्यांची बदली करण्यामागे माजी लोकप्रतिनिधींच्या चेल्यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. मागील वेळीही अनधिकृत कामे घेऊन गेलेल्यांना त्यांनी झिडकारले होते. तोच राग धरून मागील वर्षभरापासून त्यांची बदली करण्यासाठी माजी लोकप्रतिनिधींच्या चेल्यांनी मोठे खटाटोप केल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी अनेकांनी कार्यकारी अधिकाऱयांकडे संबंधित लोकप्रतिनिधींच्या चेल्यांनी पैशांची मागणीही केल्याची चर्चा आहे. मात्र, यावेळी कलादगी यांनी मी कुणाकडूनही खात नाही आणि घेतही नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचे ते करा, असे सुनावल्यामुळेच ही बदली झाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे प्रामाणिक अधिकाऱयाची बदली करण्यासाठी संबंधित चेल्यांनी माजी लोकप्रतिनिधींचे कान भरवून ही बदली केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे ही बदली रोखण्यासाठी आता नागरिकच पुढाकार घेणार असून यासाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.