सुगीच्या तोंडावर मागणी वाढली
बेळगाव / प्रतिनिधी
परतीच्या पावसाने उसंत घेतल्याने पुन्हा एकदा बळीराजा सुगी हंगामाकडे वळला आहे. सुगी हंगामासाठी लागणाऱया शेतीसंबंधी साहित्याची जमवाजमव करताना शेतकरी दिसत आहे. सुगी हंगातील मळणीचे काम अलिकडच्या काही वर्षात सर्रास पाडपत्रीवर केले जात आहे. त्यामुळे सुगी हंगाम आला की ताडपत्र्यांची विक्री जोरात सुरू होते. या पार्श्वभूमीवर शहरातील बसस्थानक रोड व एपीएमसी मार्केट यार्डमध्ये मळणीच्या ताडपत्र्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. सुगी हंगाम तोंडावर असल्याने ताडपत्र्यांची मागणीदेखील वाढली आहे.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने बटाटा, रताळी व भुईमूगच्या कामात क्यत्यय निर्माण झाला होता. मात्र चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्ग काढणीच्या कामाकडे वळला आहे. त्याबरोबर तालुक्मयातील बेकिनकेरे, अतिवाड, चलवेनहट्टी, अगसगे आदी भागातील माळरानावरील भात कापणीला प्रारंभ झाला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत सगळीकडे सुगी हंगामातील मळणीच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे मळणीकामात महत्त्वाची अशी ताडपत्री बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. पूर्वी खळय़ांवरती मळण्या व्हायच्या. आता खळय़ावरच्या मळण्या नामशेष झाल्या असून खळय़ांची जागा ताडपत्रीने घेतली आहे. त्यामुळे दरवषी सुगी हंगामाला सुरुवात झाली की ताडपत्रीच्या मागणीत वाढ होते.
ताडपत्रीमुळे मळणीची कामे शेतकऱयांसाठी सोयिस्कर होत असली तरी आर्थिक खर्च वाढला आहे. एखादी लहान मळणी करायची म्हटली तरी 8 ते 10 तर मोठय़ा मळणीसाठी 15 ते 20 ताडपत्रींची गरज असते. त्यामुळे शेतकरी मळणी कामासाठी ताडपत्री खरेदी करताना दिसत आहेत. ताडपत्रींच्या किंमती आकार व जाडीनुसार 400 ते 700 रुपयापर्यंत आहेत. येत्या काही दिवसांत सुगी हंगाम सुरू झाला की ताडपत्र्यांची मागणी वाढेल, अशी आशा ताडपत्री विपेत्यांना आहे. सध्या माळरानावरील भात कापणीला प्रारंभ झाला असून येत्या दिवसांत शिवारातील भात कापणीलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे ताडपत्रींच्या मागणीत वाढ होईल, अशी आशा ताडपत्री विपेत्यांनी व्यक्त केली. तालुक्मयात मोठय़ाप्रमाणात भात पिक क्षेत्र असून विशेष शेतकऱयांनी इंद्रायणी, शुभांगी, दप्तरी, आमन, सोनम, दोडगा, बासमती आदी जातीच्या बियाणांची पेरणी केली आहे. ही सर्व भात पिके पोसवली असून येत्या काही दिवसांत कापणीला सुरुवात होणार आहे.