आत्महत्या नसून हत्या असल्याचा निकटवर्तीयांचा आरोप, चौकशी सीबीआयकडे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयडे सुपूर्द करण्यात आली आहे. सीबीआयने प्राथमिक आरोपपत्र सादर केले असून त्यात त्यांचे शिष्य आनंद गिरी याना मुख्य आरोपी बनविण्यात आले आहे. प्रथम नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त होते. तथापि, ही हत्याही असू शकते, असे पुरावे सापडल्याने गूढ वाढले आहे.
ही आत्महत्या नसून हत्या आहे आणि ती संपत्तीसाठी झाली असावी. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी संत समाजाने केली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने चौकशी सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता. सीबीआयने 5 सदस्यांचे विशेष तपासणी दल स्थापन केले आहे. या दलाने आता पुन्हा धाडसत्र सुरु पेले आहे.
फोरॅन्सिक तज्ञ पाठविणार अहवाल
सीबीआयने फोरॅन्सिक तज्ञांची विशेष समिती बनविली आहे. ही समिती आतापर्यंत झालेल्या तपासाचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अतिरिक्त आरोपपत्र तयार करण्याचे काम सुरु आहे. शुक्रवारी आनंद गिरी यांच्या एका खोलीची फोरॅन्सिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर सीबीआयची चपे फिरण्यास आरंभ झाला. आता हे प्रकरण हत्या आहे असे समजूनच तपास केला जाणार आहे. नरेंद्र गिरी यांची मालमत्ताही सरकार जप्त करणार आहे,
महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह 20 सप्टेंबरला सापडला होता. तो खोलीच्या एका खुंटीला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. मात्र आणखी संशोधन केल्यानंतर हे प्रकरण वाटते तितके साधे नाही, हे दिसून आले. त्यांच्या खोलीत 7 पानांचे आत्महत्या पत्रही सापडले. मात्र ते त्यांचेच आहे किंवा नाही, यासंबंधी शंका असून सीबीआय त्यांच्या हस्ताक्षरांची पडताळणी करीत आहे.
प्रकरणाला राजकीय रंग
या प्रकरणात सध्या मुख्य संशयित आनंद गिरी हे आहेत. ते नरेंद्र गिरी यांचे शिष्य आणि व्यवस्थापकही होते. मृत्यूपूर्वी त्यांचे आणि आनंद यांचे दूरध्वनी संभाषणही झाले होते. या प्रकरणात साक्षीदार नसल्याने अप्रत्यक्ष पुराव्याच्या आधारावर मांडणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लाला, अशा घोषा उत्तर प्रदेश सरकारकडून लावला जात आहे. समाजवादी पक्ष, काँगेस आणि बहुजन समाज पक्षानेही चौकशीची मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन टीका केली.
राजकीय पडसाद शक्य
महंत नरेंद्र गिरी यांचे उत्तर प्रदेशातील सर्व राजकींय पक्षांशी संबंध होते. मात्र ते प्रत्यक्षात कोणत्याही पक्षाशी थेट बांधले गेलेले नव्हते. उत्तर प्रदेशात आखाडा हे लोकसंग्रहाचे एक स्थान मानले जाते. त्यामुळे राजकारणात या आखाडय़ांना महत्व आहे. उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक येत्या सहा महिन्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे हे मृत्यू प्रकरण राजकीय विषय आणि मुद्दा बनू शकते, याची जाणीव राज्यसरकारला आहे. यासाठी चौकशी लगोलग सीबीआच्या हाती देण्यात आली.
सीबीआय चौकशीला प्रारंभ
ड संशोधनाची सूत्रे उत्तर प्रदेशच्या सरकारकडून सीबीआयकडे
ड आनंद गिरी यांची सीबीआयकडून कसून दिवसभर चौकशी
ड प्रकरणाला चढला राजकीय रंग, विरोधकांची सरकारवर टीका