वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील आठ महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांच्या विकास दरात गेल्या 32 महिन्यातील सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. नैसर्गिक वायू, पोलाद, सिमेंट व वीज यांचा खप गेल्या महिनाभरात मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय कोळसा, कच्चे इंधन तेल, पेट्रोल, डिझेल, खते इत्यादींच्या विक्रीतही 8 ते 10 टक्के वाढ झालेली आहे. मार्च 2020 मध्ये या क्षेत्रांचे उणे 8.6 टक्के आकुंचन झाले होते. सध्याची वाढ ही या आकुंचनाच्या पार्श्वभूमीवर विचारात घ्यावी लागेल, असे तज्ञांनी म्हटले आहे. नैसर्गिक वायुच्या विक्रीत 12.3 टक्के पोलादाच्या विक्रीत 23 टक्के, सिमेंटच्या विक्रीत 32.5 टक्के तर विजेच्या विक्रीत 21.6 टक्के वाढ मार्चमध्ये झाली असल्याचे सांगण्यात आले. याच क्षेत्रांची मार्च 2020 मधील वाढ अनुक्रमे उणे 15.1 टक्के, उणे 21 टक्के, उणे 25 टक्के व उणे 8.2 टक्के अशी होती. ही वजावट जमेस धरता एकंदर शुद्ध वाढ 6.8 टक्के इतकी असून ती मार्च 2019 च्या बरोबरीची आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
गेल्या वषीच्या मार्च-एप्रिलमधील लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेचे आकुंचन भरून काढून एप्रिल 2021 मध्ये महत्त्वाच्या क्षेत्रांची वाढ 50 ते 70 टक्क्मयांच्या आसपास होईल, अशी अपेक्षा आहे. एप्रिल महिन्याचे आकडे येत्या एक-दोन दिवसांत प्रसिद्ध होतील. त्यावरून अर्थव्यवस्था किती प्रमाणात प्रगती करीत आहे, याचे नेमके अनुमान काढता येईल, असे मत आयसीआयए लिमिटेडच्या मुख्य आर्थिक सल्लागार आदिती नायर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिले.