चांडाळ चारुदत्ताला वधस्तंभाकडे घेऊन जात असतानाच अनपेक्षितपणे स्थावरक तिथे येऊन चारुदत्त निर्दोष असल्याचे सांगतो. ते ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांना तो म्हणतो, ‘पाहिलंत? मी मृत्यूला घाबरत नाही. पण माझा पूर्वीचा लौकिक काहींनी दूषित करून टाकलाय. नाहीतर निष्कलंक असलेल्या मला पुत्रजन्माच्या आनंदाइतकाच मृत्यूही आनंददायी वाटला असता. ज्याच्याशी माझं कसलंही वैर नव्हतं, अशा अल्पबुद्धी, तुच्छ अशा शकाराने माझं आयुष्य खोटे आरोप करून कलंकित केलं आहे.’ ते ऐकून चांडाळ स्थावरकाला विचारले की हा बोलतोय ते खरे आहे का? त्यावर स्थावरक सांगतो की, ‘हो. हे खरे आहे. कोणालाही सांगू नको’ असे मला बजावून शकाराने एका उंच माडीवरच्या गच्चीत लाकडी बेडय़ा अडकवून बंदिस्त केले होते.
त्याचवेळी शकार मंचावर प्रवेश करतो. आपण आज कसे रुचकर सामिष भोजन केले त्याचे रसभरीत वर्णन करतो. त्याला चांडाळाच्या मोठय़ा आवाजातील घोषणा ऐकून आसुरी आनंद होत असतो. नगारे, ढोल यांचे आवाज ऐकून आता नक्कीच चारुदत्ताला वधस्तंभाकडे नेताहेत हे जाणून ते दृश्य बघण्यासाठीच तो आनंदाने तिथे आलेला असतो. आपल्या अकलेचे तारे तोडतो. तो म्हणतो, ‘मारल्या जाणाऱया शत्रूला जो बघतो त्याला दुसऱया जन्मात डोळय़ांचे कोणतेही रोग होत नाहीत. कशी चारुदत्ताला अद्दल घडवलीय! आता महालाच्या उंच माडीच्या गच्चीत बसून मी माझा पराक्रम पाहीन!’ पण चारुदत्ताला वधस्तंभाकडे नेताना एवढा मोठा जनसमुदाय पाहून त्याला आश्चर्य वाटतं! त्या मूर्खाच्या मनात ते पाहून विचार येतो की, माझ्यासारख्या महान श्रे÷ पुरुषाला जर फाशी झाली, ते पहाण्यासाठी ह्यापेक्षाही मोठी गर्दी होईल की काय! अरे तो चारुदत्त एखाद्या सजवलेल्या बैलासारखा वधस्तंभाकडे जात असताना दिल्या जाणाऱया घोषणा अचानक बंद का बरे झाल्या? तो त्या महालाच्या गच्चीवर बंधक बनवलेल्या स्थावरकाला पहायला जातो. पण तिथे तो त्याला दिसत नाही. त्याच्या मनात शंका येते की, स्थावरक पळून चारुदत्ताकडे पोहचेल, तर सारे रहस्य उघड करील. म्हणून ते पाहण्यासाठी खाली उतरून तो चारुदत्ताकडे जायला निघतो. स्थावरक त्याला येताना पाहतो. स्थावरक तिथे उपस्थित चांडाळ आणि न्यायाधिकाऱयांना ओरडून सांगत असतो की, ‘महाराज, हा पहा शकार आला. अरे नीचा, वसंतसेनेला मारूनही तू संतुष्ट झाला नाहीस. आता आर्य चारुदत्ताला मारायला निघालास?’ शकार ते कबूल करीत नाही. तेव्हा सगळे लोक ओरडून म्हणतात की, ‘तूच वसंतसेनेला मारलीस, चारुदत्ताने नाही’. स्थावरकाने सारे काही सांगितले आहे. तरीही शकार कांगावा करू लागतो.