चारुदत्ताच्या आयुष्यात इतक्मया चांगल्या-वाईट घटना एकापाठोपाठ एक घडल्या की, आता कोणत्याही घटनेचा त्याला अति आनंद किंवा अति दुःख होईनासे झाले होते. त्याला वाटू लागले होते की, रहाटाने विहीरीतील पाणी काढताना काही घडे भरून येतात, तर काही रिक्त होतात. भरणे-रिक्त होणे हे रहाटगाडग्याचे काम सतत चालू असते. माणसाचे आयुष्यही परस्परविरोधी घटनांनी, भावनांनी भरलेले असते. कधी धनवान असणारा अचानक निर्धन होतो, कधी मान, प्रति÷ा मिळणाऱया समाजात त्याला अपमानास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागते. भाग्याची गती अशीच असते. कधी खाली, कधी वर! चारुदत्ताने आपल्या जीवनात भाग्याची ही विलक्षण स्थिती स्वतः अनुभवली आहे. म्हणूनच तो एक प्रकारे स्थितप्रज्ञ झाला आहे. तरीही असे होवो…..असे नाटकाच्या शेवटी भरतवाक्मयात म्हटले आहे.
मोदन्तां जन्मभाजः सततभिमता ब्राह्मणाः सन्तु सन्तः। श्रीमन्तः पान्तु पृथ्वीं प्रशमितरिपवो धर्मनि÷ाश्च भूपः।।
गाई खूप दूध देणाऱया होवोत. पृथ्वी सस्यश्यामला होवो. मेघ यथासमय वर्षाव करोत. वायू सर्वांच्या मनाला आनंद देणारा असो. जन्माला येणारे सर्व प्राणीमात्र सदैव आनंद प्राप्त करोत, सुखी राहोत. ब्राह्मण सर्वांना प्रिय असोत. सदाचारी लोक धनवान होवोत. राजे शत्रुंचे शमन करणारे आणि धर्मपरायण होऊन पृथ्वीचे पालन करोत!
नाटकाच्या शेवटी सारी पात्रे एकत्र येऊन वरील भरतवाक्मय म्हणून निघून जातात. अशा प्रकारे ‘संहार’ नावाचा दहावा अंक समाप्त होतो. मृच्छकटिक नाटकाचा शेवटही इथेच होतो.
‘अन्ते काव्यस्य नित्यत्वात् कुर्यादाशिषमुत्तमाम्’।
एकंदरीत ‘मृच्छकटिक’ हे चालत्याबोलत्या पात्रांचे जिवंत चित्रण आहे. यातील प्रत्येक पात्राचे स्वतःचे असे एक वैशिष्टय़ आहे. हे नाटक तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे परिपूर्णरित्या आपल्याला दर्शन घडवते. नाटककार शूद्रकाचे वैशिष्टय़ म्हणजे एवढे मोठे दहा अंकी नाटक लिहून त्याने एक विक्रम केला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रेक्षक त्या त्या पात्राच्या भावनांशी एकरूप होऊन जातो. असंख्य घटनांची गुंतागुंत करूनही शूद्रकाने ते कंटाळवाणे केलेले नाही. ह्या एकाच नाटकाने शूद्रक नाटककार म्हणूनही अजरामर झाला आहे. देश-विदेशातील अनेक भाषांमध्ये ‘मृच्छकटिक’ ची भाषांतरे होऊन जगप्रसिद्ध झाला आहे. खरोखरच अशी अनमोल रत्ने संस्कृत साहित्याने जगाला दिली ह्याचा प्रत्येक संस्कृतप्रिय भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल!
‘….मृच्छकटिक’……समाप्त