-आबाजींचा शौमिका महाडिकांना टोमणे , –डोंगळेंचेही तोंडसुख, घाणेकरांना सुवर्णकाळचा साक्षातकार
विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
दुपारी एक वाजता चेअरमन विश्वास पाटील अहवाल सालचा आढावा घेत होते. चार महिन्यात काय केले हे सांगत असतानाच विरोधी संचालिका शौमिका महाडिक सभागृहात आल्या. हीच संधी साधत आबाजींनी भाषणाची दिशा बदली. त्यावेळेलाही `मी भाकरी थापली, परतली आणि आताही मीच भाकरी परतवली, यापुढे ती करपणार नाही याची काळजी घेईन. असे सांगत माझ्यामुळेच सत्तांतर झाल्याचे ठासून सांगत गोकुळ लेचापेच तर नाहीच आणि भविष्यात डळमळणारही नाही. अशा शब्दात चेअरमन विश्वास पाटील तथा आबाजी यांनी विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांना फटकारले.
तर आभाराच्या भाषणात ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी `ऐकायंच पुढं जायचं दिवस संपलेत’ असे सांगत महाडिकांनाच लक्ष्य केले. तर कार्यकारी संचालक घाणेकर यांना जाताजाता गोकुळचा सुवर्णकाळ सुरु झाल्याचा साक्षात्कारही झाल्याचे सभेत पहावयास मिळाले. ही सर्व टोलेबाजी शौमिका महाडिक मात्र हसतमुखपणे ऐकत होत्या. हे विशेष…
तीस वर्षानंतर गोकुळमध्ये सत्तांतर झाले माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता उधळवून लावत मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी एकहाती सत्ता मिळवली. त्यांच्या चार महिन्यांच्या कारभारानंतर ही पहिलीच वार्षिक सभा होती. तत्पूर्वी विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी सत्ताधाऱयांवर गंभीर आरोप केल्याने सभेत काय होणार, सत्ताधारी विरोधक जुंपणार काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
अहवाल सालचा आढावा घेत होते. चार महिन्यात काय केले हे सांगत असतानाच पुर्वाश्रमीचे त्यांचे नेते महादेवराव महाडिक यांच्या सुनबाई संचालिका शौमिका महाडिक सभागृहात आल्या. हीच संधी साधत आबाजींनी भाषणाची दिशा बदली ते म्हणाले, संघाचा राखीव निधी 120 कोटी आहे. त्याला हातही लागणार नाही. आमचा संघ लेचापेचा नाही. असा निशाना साधला, त्यावेळीही म्हणचे (महाडिकांची सत्ता आणण्यात) आपणच पुढाकार घेत होतो आणि सत्तांतर करण्यातही आघाडीवर होतो असे महाडिक यांच्याकडे पहात टोला हाणाला. संघाची काळजी घेण्यास आम्ही समर्थ असल्याचेही सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यानंतर मावळते कार्यकारी संचालक घाणेकर विषय पत्रिका वाचताना त्यांनी दोन्ही मंत्र्यांचे तोंडभरुन कौतुक केले. विषयापेक्षा कौतुकाचे बोल प्रभावीपणे मांडले, गोकुळचा आता सुवर्णकाळ झाल्याचे सांगत मुंबई, रायगड येथील जागा खरेदी आणि प्रकल्प उभारणी कशी हिताची आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. जमीन घेतील म्हणजे लगेच इमारत बांधकाम सुरु केले असे होत नाही. हा प्रकल्प यापूर्वीच व्हायला पाहिजे होता असे सांगत महाडिक यांनाच लक्ष्य केले. आता नेते सरकारमध्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्या टप्प्याने काम सुरु करता येईल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मदतीसाठी कोणाच्या दारात नाचायची वेळ गोकुळवर येणार नाही असे ठासून सांगितले. आभाराच्या भाषणात हाच धागा पकडत अरुण डोंगळे यांनी पशुखाद्य कारखाना आणि गोकुळ शिरगाव प्रकल्पासाठी जागा घेताना असाच विरोध झाला होता. पण चुयेकारांनी कुणालाही जुमानले नाही. त्यांचा तो निर्णय बरोबर होता. असेच आता वाटते. त्यामुळे रायगडच्या जागेला विरोध निरर्थक आहे. यापूर्वी ऐकायचं आणि पुढं जायचं हे आता होणार नाही. असे सांगत मागील सत्ताधाऱयांची एकप्रकारे हुकुमशाहीच होती अशी कबुलीच त्यांनी दिली तथापि शेवटी शेवटी दूध उत्पादक आणि मागील सत्ताधारी यांचेही संघाच्या विकासात योगादान असल्याचे सांगत सावरण्याचा प्रयत्न केला