जिल्हय़ातील 70 ग्रामपंचायतींची नावे पाठविली : बेनकनहळ्ळी, हिरेबागेवाडी, बेकिनकेरे, सुळगा (हिं) ग्रामपंचायतींचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गाव स्वच्छ आणि हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली असून ती कामे पूर्ण करण्यात आली आहेत. परंतु अजूनही विकासाच्यादृष्टिने प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गावाची झालेली प्रगती पाहून महात्मा गांधी पुरस्कार देण्यात येतो. तालुक्मयातील विकसित ग्रामपंचायतींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सध्या बेळगाव जिल्हय़ातील 70 ग्रामपंचायतींची नावे या पुरस्कारासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहेत. येत्या दि. 2 ऑक्टोबर रोजी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
बेळगाव तालुक्मयातील 4 ग्रामपंचायतींची नावे पाठविण्यात आली आहेत. 2 ऑक्टोबर रोजी बेंगळूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करुन हा पुरस्कार दिला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे आता हा पुरस्कार जिल्हा पातळीवर देण्यात येत आहे. गांधी पुरस्काराबरोबरच निर्मल ग्राम पुरस्काराचेही वितरण करण्यात येते. त्यामुळे हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. यासाठी जिल्हय़ातील अनेक ग्रामपंचायतींचे प्रयत्न असतात. मात्र यासाठी विशेष समिती नेमून प्रत्येक तालुक्मयातील मोजक्मयाच ग्रामपंचायतींची नावे राज्य सरकारकडे पाठविण्यात येतात. त्यानंतर राज्य सरकार तालुक्मयातील ग्राम पंचायतींची निवड करते.
या पुरस्कारासाठी तालुका पातळीवर जोरदार प्रयत्नही करण्यात येतात. यामुळे ज्या गावांनी विकासकामे वेळेत पूर्ण केली आहेत त्या गावांना निर्मल ग्राम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव तालुक्मयातील 4 ग्राम पंचायतींची नावे सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. यापैकी एकाच ग्राम पंचायतीला हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. बेनकनहळ्ळी, हिरेबागेवाडी, बेकिनकेरे, सुळगा (हिं) या ग्रामपंचायतींची नावे सरकारकडे पाठविण्यात आली आहेत. दरम्यान ग्राम पंचायतींच्या नावांची निवड करण्यासाठी इतरत्र तालुका कार्यकारी अधिकारी अथवा साहाय्यक सचिवांना पाठविण्यात येते. त्यामुळे ही निवड प्रक्रिया करण्यासाठी दुसऱया तालुक्मयातील अधिकाऱयांची निवड करण्यात येते.
ग्राम पुरस्कारासाठीही 70 गावांची निवड करण्यात आल्याने आता कोणत्या ग्राम पंचायतीला हा पुरस्कार मिळणार याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. ग्राम पंचायतींची नावे पाठविण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. ज्या ग्राम पंचायतीमध्ये कामे अर्धवट आहेत तेथील अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याचे तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी सांगितले.
ग्रा.पं.ची निवड केलेल्या अधिकाऱयांची नावे | तालुका | निवड झालेल्या ग्राम पंचायतींची नावे |
जि.पं.चे साहाय्यक कार्यदर्शी पी. एम. घस्ती | बेळगाव | बेनकनहळ्ळी, हिरेबागेवाडी, बेकिनकेरे, सुळगा (हिं) |
जि.पं.चे साहाय्यक कार्यकारी अधिकारी राहुल अ. कांबळे | खानापूर | लोंढा, नंदगड, बिडी, नागुर्डा, नंजनकोडल |
कागवाड-चिकोडीचे ता.पं.चे कार्यकारी अधिकारी वीरनगौड विगनगौडर | निपाणी | शेंडूर, सौंदलगा, हुन्नरगी, जत्राट, बेडकिहाळ |
बैलहोंगल-कित्तूर ता. पं. कार्यकारी अधिकारी सुभाष संपगावी | सौंदत्ती | रुद्रापूर, सुतगट्टी, माडमगेरी, बेटसूर, गोरवनकोळ्ळ |
रामदुर्गचे ता. पं. कार्यकारी अधिकारी एम. एच. देशपांडे | बैलहोंगल | वन्नूर, वकुंद, बेळवडी, संगोळ्ळी, देवलापूर, संपगाव |
बेळगावचे ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर | हुक्केरी | कोचरी, यमकनमर्डी, बस्सापूर, अंकले, शहाबंदर |
अथणीचे ता. पं. कार्यकारी अधिकारी एस. बी. करबसप्पगोळ | कागवाड | मंगसुळी, शिरगुप्पी, उगार बी.के., मोळे, कृष्णाकित्तूर |
मुडलगी ता. पं. कार्यकारी अधिकारी सुदीप चौगुले | गोकाक | तवग, ममदापूर, मिडकनट्टी, कुंदरगी, मेळवंकी |
निपाणी ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी | चिकोडी | शमनेवाडी, जनवाड, केरुर, जागनूर |
सौंदत्ती ता. पं. कार्यकारी अधिकारी यशवंतकुमार | रामदुर्ग | होसकोटे, कित्तूर, मुदेनूर, गोडची, के.जुनीपेठ |
रायबाग ता. पं. कार्यकारी अधिकारी सुरेश कद्दु | अथणी | अथणी (ग्रामीण), अनंतपूर, शेरुर, मलाबाद, कटगेरी |
खानापूर ता. पं. कार्यकारी अधिकारी प्रकाश हालमंणवर | कित्तूर | अंबडगट्टी, काद्रोळी, दास्तीकोप्प, कलभांवी, देवरशिगीहळ्ळी |
हुक्मकेरी ता. पं. कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ | मुडलगी | तुक्कानट्टी, सुणधोळ्ळी, पटगुंदी, हळ्ळूर, कुलगोड |
चिकोडी प्रभारी साहाय्यक सचिव शिवानंद शिरगावी | रायबाग | नंदीकुरळी, सिद्धापूर, यड्राव, शिरगुर, भिरडी, निपनाळ |