शिवाजी हासणेकर यांचे मत- शास्त्री विद्यालयात पुण्यतिथी कार्यक्रम
वार्ताहर/ मणगुत्ती
माणसाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून महात्मा जोतिबा फुले यांनी तळागाळातील सर्व सामान्य माणसापर्यंत शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला. तत्कालीन प्रवाहाच्या विरोधात पोहून त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, असे विचार शिवाजी हसनेकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयात आयोजित महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष झुंझारराव पाटील हे होते. मुख्याध्यापक डी. के. स्वामी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक आर. ए. कामनगोळ, आर. बी. शामने, ए. एन. कदम, एस. एम. कोतेकर, ए. पी. पाटील, बाळू मगदूम, ए. के. पाटील, के. एम. राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.