जिल्हाअधीकारी यांच्याकडे नागरिकांची मागणी!
वार्ताहर/ कुकुडवाड
राज्य सरकारने सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा गैरवापर वापर करून जिह्यातील अनेक खाजगी रुग्णालये आजारी माणसाच्या नातेवाईक यांची लूट करीत असल्याचे प्रकार समोर येत असून सातारा जिल्हाअधिकारी व आरोग्य खात्याने अशा प्रकरणात आळा घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की 23 मे रोजी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्याचे रहिवासी असलेल्या सर्वाना विनाशुल्क कोविड-19 उपचार पुरवण्यात येतील.उपचारासाठी खर्च हा महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शासनाकडून उचलण्यात येईल.ही योजना पूर्वी कमी उत्पन्न गटासाठी होती.परंतु कोविड19 च्या सर्व रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.रुग्णांचे आधार कार्ड,रेशन कार्ड,हा रहिवाशी पुरावा म्हणून समजला जाणारा आहे.राज्य भरात 973 अंगीकृत रुग्णालये असून ते खाजगी किंवा शासकीय असो त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही असे राज्य शासनाने योजनेच्या आदेशात नमूद केले आहे.
परंतु नफेखोरी करणाया अनेक डॉक्टर व रुग्णालये या योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी आडकाठी करीत असून त्या योजनेचा फायदा घेत रुग्णाची लूट करताना दिसत आहेत.याकडे कुणीच सध्या लक्ष देत नसून अनेक खाजगी डॉक्टर व रुग्णालयांनी लूट सुरू केली आहे.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना या योजनेची माहिती दिली जात नाही.त्याबाबतची कोणतीही माहिती रुग्णालयात चिकटवलेली नाही,या योजणेबाबत साधं एक पत्रक सुद्धा दिसत नाही.मात्र रुग्णावर उपचार करायचे संपूर्ण बिल त्याच्या नातेवाईक यांचेकडून घेऊन त्याचं रुग्णांचा या योजनेत समावेश करून सरकारी तिजोरीत हात घालणारी एक साखळी तयार झाली आहे.ही साखळी तुटली नाही तर आर्थिक मंदी व लॉक डाऊन मुळे मेटाकुटीला आलेले नागरिकांचा कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो.
अशा अनेक घटना सातारा जिह्यातील अनेक रुग्णालयात घडत असून आरोग्य विभाग व जिल्हा अधिकारी यांनी लक्ष पुरवणे काळाची गरज आहे.
नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड,रेशनकार्ड कार्ड,रहिवासी पुरावा म्हणून रुग्णालयात दयावा लागणार आहे.त्याचबरोबर शासन निर्णय प्रत सुद्धा सादर करावी.