प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. कोरोना बाधितांना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यांच्यावर अंत्यविधीसाठी नातेवाईकांचे हाल होत आहेत. तसेच अंत्यविधी करताना मृतदेह जाळण्यासाठी प्लास्टिक आणि टाकाऊ पीपीई किटचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आता रॉकेल उपलब्ध केले असून गरजूंना रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या आता वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात दररोज अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येत आहे. पण पावसामुळे अंत्यविधी करण्यात अडथळे निर्माण होत असून मृतदेह व्यवस्थित जळत नसल्याने अडचण निर्माण होत आहे. अंत्यविधीसाठी रॉकेलही मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहेत.
कोरोनाबाधित मृतदेह जाळण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱयांवर आहे. मात्र मृतदेह जाळण्यासाठी टाकाऊ कचऱयाचा वापर करावा लागत आहे. तसेच अंत्यविधी करताना काही मोजक्मयाच नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यविधी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱयांवर पडत आहे. पण पावसात मृतदेह जळत नसल्याने रॉकेलची आवश्यकता आहे. पण रॉकेल मिळत नसल्याने टाकाऊ प्लास्टिक आणि टाकाऊ पीपीई किटचा वापर करण्यात येत आहे. या समस्येचा विचार करून महापालिकेने रॉकेल उपलब्ध केले आहे. गरजूंसाठी महापालिकाच रॉकेल उपलब्ध करून देणार आहे. महापालिका आयुक्तांच्या सुचनेनुसार रॉकेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.