भाड्य़ाच्या खोलीत भरते शाळा, मूळ जागेवर व्यापारी संकुल
सुधाकर काशीद/कोल्हापूर
शाळेच्या जागेवर व्यापारी संकुल आणि शाळेची मूळ जागा मात्र एका भाडय़ाच्या खोलीत. ही टोकाची विसंगती महापालिकेच्या रावबहादूर विचारे विद्यालयाच्या वाटय़ाला आली आहे. विशेष हे की या रावबहादुर विचारे यांनीच ही जागा त्यावेळी नगरपा†लकेच्या शाळेसाठी दिली होती. काळ बदलला. आणि महापालिकेने शाळेच्या जागेत वापराचा उद्देश बदलला. आणि काही दिवसातच शाळेच्या जागी व्यापारी संकुलाचा मोठा डोलारा उभा राहिला. मूळ शाळा एसटी स्टँड जवळ होती आता तेथे व्यापारी संकुल आहे. आणि शाळा मात्र गावाबाहेर जिवबा नाना पार्कात फक्त एका भाडय़ाच्या खोलीत कशीबशी भरत आहे.
कोल्हापूर नगरपा†लकेने त्या काळात शिक्षणाची दारे सर्वांना खुली व्हावीत यासाठी शहराच्या सर्व भागात स्वतची इमारत व क्रीडांगणाच्या सा†वधांसह शाळा बांधल्या होत्या. त्यातली रावबहादुर विचारे विद्यालय ही एक शाळा. त्या काळात या शाळेचा खूप लौकिक होता. बहुजन व गोरगरिबांची मुले या शाळेत एक पैसा खर्च न करताही सातवीपर्यंत शिकली. शाळेसमोर बोगन वेलीच्या फुलाचे सुंदर कुंपण असलेल्या मैदानात लंगडी पळती, खोखो, रिंग फेक, सामाहिक कवायत करत मुले मातीत रंगली. पुढे शहरात खासगी शाळा सुरू झाल्या. आणि पालकांचा कल तिकडे वाढला. नगरपालिकेच्या शाळा म्हणजे गावठी असा प्रचार एका यंत्रणेने जाणीवपूर्वक पसरवला. त्यामुळे पटसंख्या कमी झाली. अर्थात रिकाम्या शाळा व त्या समोर जी मोकळी जागा काही जणांच्या ‘नजरेत’ होतीच. त्यामुळे तेथे महापालिकेच्या ठरावानुसार व्यापारी संकुलाची उभारणी झाली.
शाळेसाठी याच इमारतीत एका कोपऱयात जागा देण्यात आली. अर्थात तिथे विद्यार्थी येणे शक्यच नव्हते. त्यामुळे अखेर ही शाळा अन्यत्र हलविण्याचा निर्णय झाला. व जिवबा नाना पार्कात एका भाडय़ाच्या खोलीत रावबहादूर विचारे विद्यालय या नावाने ही शाळा सुरू राहिली. विशेष हे की ही शाळा सेमी इंग्रजी माध्यमातून आहे.
आता या शाळेत 74 विद्यार्थी आहेत. शाळा एकाच खोलीत असल्याने ते वीस जणांना प्रवेश नाकारायची वेळ आली आहे. या शाळेला किमान तीन खोल्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे शाळेच्या जागेवर किमान 100 गाळे व मोठे हॉल असलेले व्यापारी संकुल आहे. आणि शाळा मात्र फक्त एका खोलीत आहे. तरीही प्रशासन व शिक्षकांनी शाळा आपल्या जिद्दीवर चालवलेली आहे. या शाळेत एक पैसाही फी नाही. गणवेश, पुस्तके, दप्तर मोफत आहेत. याहीपेक्षा ज्ञान, संस्कार, सचोटी, कष्ट याचे संस्कार पहिल्या इयत्तेपासून देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. गोरगरिबांची 74 मुले रोज गोडीने शाळेत येत आहेत. पण जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं वारंवार म्हणणाऱयांनी या शाळेला एकदा भेट देण्याची गरज आहे. कारण ही एक खोलीची शाळा म्हणजेच तेथे सद्गुणाची खाण दडली आहे.
हे रावबहादूर विचारे कोण ?
ज्या रावबहाद्दूर विचारे यांच्या नावाने ही शाळा आहे. त्यांचे पूर्ण नाव दाजीराव अमृतराव विचारे. ते कोल्हापूर संस्थानचे मुख्य आ†भयंते होते. त्यांच्या देखरेखीखाली कोल्हापुरातील अनेक मुख्य वास्तू उभ्या राहिल्या. त्यांच्याच देखरेखीखाली राधानगरी धरणाचे काम झाले. आा†ण त्यांच्या कामा†गरीचा गौरव म्हणून राधानगरी धरणाजवळच्या ओलवण गावातील परिसराला दाजीपूर असे नाव दिले गेले.