392 गावातील 1 लाख 75 हजार शेतकऱ्यांना लाभ, पीक नुकसान भरपाईही तीन पट
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरल्यानंतर पीकनिहाय नुकसानीची माहीती संकलन सुरु आहे. त्यासोबत दुसऱ्या बाजुला बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचाही अंदाज घेतला जात आहे. त्यामुळे नुकसान भरपाई सोबत कर्जमाफीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असतान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापुरातील कर्जमाफीची मागणी करुन वाट करुन दिली आहे. हे सत्यात उतरल्यास जिल्ह्यातील पूरबाधित 392 गावातील 58 हजार हेक्टरवरील पीक कर्जमाफी होऊ शकते. याचा पावनेदोन लाख शेतकऱयांना लाभ शक्य आहे. असा अंदाज बांधला जात आहे.
२०१९ च्या महापूरातील कर्जमाफीचा आधार
या कर्जमाफीला 2019 च्या महापुरातील कर्जमाफीचा आधार दिला जात आहे. यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरातील बाधित शेतकऱयांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती. जुलै, ऑगस्ट 2019 या दोन महिन्यात झालेल्या अतिवृर्ष्टी मुळे महापूर आला होता. या महापुरात शेतीतील पीके नष्ट झाली होती. त्यामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. याचा जिल्हÎातील 1 लाख 3 हजार 957 शेतकऱयांना लाभ झाला होता. 314 कोटी 32 लाख 76 हजार 728 कोटींची कर्जमाफीची फडणवीस यांनी घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात त्यांचे सरकार कोसळले राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे कर्जमाफीचा फेच निर्माण झाला होता. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शेतकऱयांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा करुन शेतकऱयांना दिलासा दिला होता. तर पीक नुकसानभापाईचे निकष बदलून मदत केली होती. 2015 ला नुकसान भरपाईचे निकष ठरवण्यात आले होते. त्यात बदल करुन तिप्पट नुकसानी भरपाई दिली होती.
पंचनामे पूर्णत्वानंतर घोषणा शक्य
यंदाच्या महापुराची स्थितीही 2019 पेक्षा वेगळी नाही. त्यापेक्षाही भयावह आहे. 2019 ला 9 दिवसात 480 टक्के पाऊस पडला होता. यंदा केवळ पाच दिवसात सरसरीच्या 50 टक्के पाऊस पडला आहे. गतवेळी पंचगंगा नदीची पाणीपातळी 55.8 तर यंदा 56.3 फूट होती यावरुन महापुराची भीषणात लक्षात येते. आता चार दिवसात पूर ओसरण्यास सुरवात झाली तरी अजूनही पीके पाण्यखाली आहेत. पूर ओसरलेल्या ठिकाणी पंचनामे सुरु झाले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात नुकसानीचे चित्र समोर येईल. त्यानंतर नुकसान भरपाईसह कर्जमाफीची घोषणा होईल या अपेक्षेवर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित तालुकानिहाय गावे
गगनबावडा 23
हातकणंगले 13
इचलकरंजी 06
शिरोळ 41
करवीर 55
कागल 41
पन्हाळा 57
राधानगरी 26
शाहूवाडी 39
चंदगड 28
भुदरगड 27
आाजरा 13
गडहिंगलज 23
एकूण 392
असे आहेत निकष
पीक नुकसान भरपाई हेक्टरसाठी
(13 मे 2015च्या शासन निर्णयानुसार)
क्षेत्र नुकसान भरपाई
जिरायत 6800
बागायती 13500
फळबाग 18000
कोणतेही निकष न लावता कर्जमाफी झाली पाहिजे
महापुरामुळे शेतातील उभी पिके नष्ट झाली आहेत. या पीकांसाठीच बँकांनी कर्ज दिले आहेत. आता शिवारात पीकच नाही तर कर्ज परतफेड करणार कसे. त्यामुळे कोणतेही निकष न लावता महापुरातील कर्जमाफी झाली पाहिजे.
– शिवाजीराव माने जय शिवराय किसान संघटना