प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात दरवर्षी पुराचे संकट निर्माण होत आहे. या महापुराचा शास्त्राrय अभ्यास करा. त्यासाठी समिती स्थापन करुन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाला अहवाल द्यावा, अशी मागणी पूरग्रस्त समितीने शुक्रवारी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे केली. यावेळी निमंत्रक बाजीराव खाडे यांच्या शिष्टमंडळाने सव्वाशेहून अधिक ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.
बाजीराव खाडे म्हणाले, यावर्षी आलेल्या महापुरामुळे गावातील नागरिकांच्या घर, शेती व व्यापारी क्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले यामुळे गावकयाचे जीवनमानही धोक्यात आलेले आहे. या पुराबाबत मानवनिर्मित चुकांचे परिणाम दाखवणारे निवेदन यापूर्वी दिले होते. गंभीर होत चालेल्या पूरस्थिती बाबत गावकयाशी चर्चा करून, ग्रामपंचायतीचे ठराव घेण्यात आले आहेत.
ते पुढे म्हणाले, महापुराचा शास्त्राrय अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी, या समितीने प्रत्येक गावातील आणि परिसराची पाहणी करावी स्वतंत्र अभ्यास करावे आणि जिह्याचा आराखडा तयार करून कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात याकरिता प्राथमिक पातळीवर जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकायांची आणि पूरग्रस्त समितीची बैठक घ्यावी.
यावेळी खाटांगळेचे सरपंच सतीश नाईक, वाठार तर्फ वडगावचे सरपंच शंकरराव शिंदे, कुडित्रेच्या सरपंच जोत्सना पाटील,चिंचवडेचे सरपंच युवराज कांबळे, रुईचे सरपंच सुभाष चौगले, शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे, पाडळी खुर्दचे सरपंच तानाजी पालकर, पुनाळचे सरपंच युवराज पाटील, लाटवडेचे सरपंच संभाजी पवार, कसबा बीडचे सरपंच सर्जेराव तिबिले, हणमंतवाडीचे सरपंच संग्राम भापकर, सरपंच सेवा संघाचे समन्वय ऋषिकेश विर आदी उपस्थित होते.
सव्वाशेहून अधिक ग्रामपंचायतींचे ठराव सादर
महापुराबाबत कायमस्वरूपी उपाय योजना होण्यासाठी शास्त्राrय अहवाल तयार करण्याकरिता समिती नेमावी. समितीने कार्यक्रम जाहीर करून पूरग्रस्तांची संवाद साधावा. तज्ञांशी खुल्या व्यासपीठावर चर्चा करावी. अहवाल शासनाला सादर करण्यापूर्वी त्यातील शिफारशी जाहीर करुन लोकांकडून सुचना घ्याव्यात. यातील योग्य सुचनांचा समावेश करुन अंतिम अहवाल शासनाला सादर करावा. यापुढे रस्त्यांच्या कामासाठी जलसंपदा विभागाची शिफारस घ्यावी, आदी ठराव सव्वाशेहून अधिक ग्रामपंचायतींनी केले असून ते शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.