प्रतिनिधी / कोल्हापूर
गतवर्षी कोल्हापूर, सांगली जिल्हय़ातील महापुराच्या अभ्यासासाठी नियुक्त वडनेरे समितीचे निष्कर्ष हे वरवरचे आहेत. समिती खोलात गेलीच नाही. अलमट्टीतून सोडण्यात येणारे पाणी अन् पाण्याची फुग याचा विचार करून कर्नाटक आणि महाराष्ट्राने समन्वयाने महापूर काळात हा प्रश्न हाताळावा, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट पेले.
इचलकरंजी पाणी योजनेच्या बैठकीसाठी ते गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. पण तोपर्यत पाणी योजनेची बैठक संपली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात कृष्णा अन् तिच्या उपनद्यांतून येणाऱया पाण्याचा विस्तार पाहता प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. कर्नाटकातील अलमट्टी आणि आंध्र प्रदेशातील नारायणपूर प्रकल्पात पाण अडवणे आणि विसर्ग यात तीन राज्यात समन्वय आवश्यक आहे. गतवर्षीच्या महापुरासंदर्भात नियुक्त वडनेरे समितीने वरवरचे निष्कर्ष काढल्याची टीका त्यांनी केली.
गतवर्षी अलमट्टीची पाणी पातळी 517 मीटरवर होती. त्यावेळी नृसिंहवाडी येथील पाणी पातळी 531 मीटरवर होती. अलमट्टी ते नृसिंहवाडी यामध्ये 269 किलोमीटर अंतर आहे. पण पाण्याचा उतारा मात्र 2 मीटरइतकाच आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची गती मंदावते. कृष्णा अन् तिच्या उपनद्यांतून येणारे पाणी अडून राहिल्याने 20 दिवस पाण्याची फुग कायम राहून महापुराचे संकट ओढावत आहे. त्यामुळे पाऊस नसताना अलमट्टीची पाणी पातळी 509 मीटरपर्यत ठेवावी अन् 15 ऑगस्टनंतर ती हळूहळू वाढवत 530 मीटरपर्यत नेल्यास हा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने संयुक्तपणे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.