प्रतिनिधी / बार्शी
लॉकडाऊन आणि नैसर्गिक संकटातून बळीराजा आधीच पिचलेला असताना आता मात्र महाबीज आणि इतर कंपनी यांचे कडून खरेदि केलेले सोयाबीन चे बियानेची पेरून उगवले नसल्याने अधिक संकटात सापडला असून आता दुबार पेरणीचे संकट बार्शी तालुक्यातील शेतकरी वर्गावर आले आहे . त्या मुळे बाधित शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी काही शेतकरी यांनी केली आहे .
सविस्तर वृत्त असे की, बार्शी तालुक्यात खरीप पिकाच्या पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रमुख पिक असलेले सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. मात्र महाबीज कंपनीचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी घेऊन पेरणी केलेली आहे त्याचे बी उगवले नाही. अशी तक्रार अनेक शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यावर पहिलेच कोरोनाचे संकट आल्याने शेती पिकाला कसलाच भाव नाही, बँका पिक कर्ज देत नाहीत, तालुक्यातील 43 हजार शेतकरी सन 2018-19 मधील दुष्काळ निधी पासून वंचित आहेत. अशा एक ना अनेक संकटे वर्षा नु वर्षे येत असताना परत अजून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तरी तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी बार्शी यांनी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे सोयाबीन बी पेरणी केली आहे, त्यांची बी उगवले नसल्याने सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान द्यावी अशी मागणी राहुल भड, विष्णू पवार, दीपक जाधव, लता यादव आणि अशोक माळी आदी शेतकरी यांनी केली आहे.