वार्ताहर/ सांबरा
योग ही एक अद्भुत शक्ती आहे. योगामुळे शरीर निरोगी राहते. शरीर सुदृढ बनते. मन आनंदमय बनते. शरीरावर चांगले संस्कार होतात. शरीराच्या निकोप वाढीसाठी महामारी सांसर्गिक कोरोना काळात योगाची नितांत गरज आहे, असे मौलिक विचार पतंजली योग समितीचे किसान प्रभारी जोतिबा भादवणकर यांनी व्यक्त केले. ते मुचंडी येथे सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात आनंदी जीवन योग समितीच्या तिसऱया वर्धापन दिनानिमित्त प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदी जीवन योग समितीचे अध्यक्ष हभप यल्लाप्पा चौगुले होते. प्रमुख अतिथी म्हणून योगशिक्षक मोहन बागेवाडी, संगीता कोनापुरे, रमेश पाच्छापुरे, सुनंदा खेमणे, लक्ष्मी पाटील, सहदेव आनंदाचे उपस्थित होते.
भीमराव जक्काणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनंदा खेमणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहदेव आनंदाचे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मोहन बागेवाडी म्हणाले की, योगामुळे अंतर्मनात सात्विक विचारांची निर्मिती होते, नकारात्मक विचारांचा ऱहास होतो. त्यामुळे जीवनात समाधान प्राप्त होते.
याप्रसंगी निंगाप्पा कडोलकर, सिदराई घसारी, नागेंद्र भावे, नारायण ताशिलदार, जोतिबा लाड, नारायण देमाणे, महादेव हुलमणी, सिद्धाप्पा ताशिलदार, कृष्णा हुलीकोत्तली, सिद्धाप्पा पाखरे यांच्यासह बहुसंख्य योगसाधक उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलिक कुंडेकर यांनी केले. सुनंदा खेमणे यांनी आभार मानले.