वार्ताहर/ माखजन
मुंबई-गोवा महामार्गावरूनचा खडय़ांतून होत असलेला प्रवास गणेशभक्तांसाठी ठरतोय धोकादायक. आरवली खेरशेत ते सावर्डे मार्गावर अनेक ठिकाणी महामार्गा पक्का झाला आहे मात्र खेरशेत दरम्यान काही ठिकाणी रस्ता अर्धवट राहिल्यामुळे रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढत पुढे जाणे हे दुचाकी व मोठय़ा वाहनधारकासाठी डोकेदुःखी ठरत आहे अनेकांना पाठदुकीचा त्रास होत उद्भवू लागला आहे.
या ठिकाणी सकाळ सत्रात रोलर फिरवला जातो मात्र दुपार पर्यँत खडय़ांच्या आकडा शतके पार झालेला असतो या साठी कायमस्वरूपी खड्डय़ांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे खेरशेत सोडल्यानंतर रस्त्याच्या कडेला लावण्यात आले संरक्षक कठडे व पाईपचे स्तंभ उभे केले आहेत मात्र अनेकदा ते रस्त्यावर आलेले असतात. सद्या मुसळधार पाऊस कोसळत आहे या खडय़ात पाणी राहिल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. कंत्राट दार कंपनीने तात्काळ याकडे लक्ष देऊन हा मार्ग खड्डे मुक्त करून प्रवाशांना सुरळीत करून द्यावा, अशी मागणी प्रवाशी वर्गासह वाहनधारक मंडळी कडून होत आहे.
अन्यथा खड्डयांमध्ये वृक्षारोपण करणार
महामार्गावर मोठया प्रमाणावर खड्डे पडले आहेत याची तात्काळ दखल कंत्राटदार कंपनीने घ्यावी व मार्गावरील कायम स्वरूपी खड्डे दूर करून प्रवाशांना सोयीस्कर प्रवास व्हावा अन्यथा कार्यकर्त्यांसह खड्डय़ातच वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य नाना कांगणे यांनी दिला आहे.