प्रतिनिधी -नागठाणे
महामार्गावर वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. त्यामुळे अपघात होणार नाहीत व मृत्यूचे प्रमाणही कमी होईल. तुमच्या व इतरांच्या कुटुंबाचा विचार करा.असे आवाहन महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ कळके यांनी केले.
अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक विभाग मुंबईचे डॉ.भूषणकुमार उपाध्ये यांच्या संकल्पनेतुन येथील तासवडे (ता.कराड) टोलनाक्यावर कोरोना काळात सोशल डिस्टन्स ठेऊन अपघात रोखण्यासाठी सपोनि रघुनाथ कळके व सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी प्रवाशी व वाहन चालकांना सुचना दिल्या.यावेळी वाहन चालकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, महामार्गावर येण्यापूर्वी वाहन सुस्थितीत आहे का? याची खात्री करा. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका.मदयप्राशन करुन वाहन चालवू नका. अपघात झाल्यास पळून न जाता अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत करा.
यावेळी पीएसआय अशोक जाधव म्हणाले, महासंचालक डॉ. भुषनकुमार उपाध्ये यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. महामार्गावरील अपघाताची माहिती पोलिसांना देवून सहकार्य करावे. वेगमर्यादेचे उल्लंघन करू नका. नियंत्रित वेगात वाहन चालविल्यास अपघात होणार नाही.
यावेळी पथकातर्फे महामार्गावरील गाड्यांना रिफ्लेक्टर बसवण्यात आले. यावेळी सहायक फौजदार राजू बागवान, सिकंदर लांडगे, पोलिस नाईक, प्रकाश कारळे, वैभव निकम, दादा राजगे, सचिन घोरपडे, मधुकर पवार, वैभव पुजारी यांची उपस्थिती होती.
Previous Articleपार्वतीनगर येथे तिघा मटकाबुकींना अटक
Next Article अनोळखी तरुणीचा झोपेतच मृत्यू
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.