यावर्षी होणाऱया निवडणुकांचा विचार करून त्या राज्यात महामार्ग विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात खास तरतूद करण्यात आली आहे. तामिळनाडू, प. बंगाल आणि आसाममध्ये महामार्गाच्या विकासासाठी रक्कम तरतूद करण्यात आली आहे.
8 हजार 500 किमीचे रस्ते, महामार्ग विकासाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. याअंतर्गत प. बंगालसाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून केरळ राज्याकरीता 65 हजार कोटी रुपयांची तर आसाम राज्याकरीता 3 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. निवडणुका डोळय़ासमोर ठेऊन सदर राज्यात रस्ते विकासावर भर देण्याचे ठरवले आहे.