संगमेश्वर/ वार्ताहर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील संगमेश्वरजवळच्या ब्रिटीशकालीन सोनवी, बावनदी आणि सप्तलिंगी पुलाचे कठडे धोकादायक बनले आहेत. यापैकी सप्तलिंगी पुलाची खूपच दुरवस्था झाली असून नवीन पुलांची कामेही रखडली आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्राr, आरवली, सप्तलिंगी आणि बावनदी पुलांची कामे सुरु असली तरी खूपच संथगतीने सुरु आहेत. गेले 3 वर्षे ही कामे रखडलेलीच आहेत. नवीन पुलांच्या कामांमुळे जुन्या पुलांकडे लक्षच नसल्याने पूल अधिक धोकादायक झाला असताना त्याचे काम पहिल्यांदा हाती घेण्यात आले होते, मात्र अद्यापही या पुलाचे काम हाती घेण्यात आलेले नाहीत. संगमेश्वर जवळच्या सोनवी, शास्त्राr पुलांबाबत ओरड झाल्यानंतर या पुलांवरील पाणी बाहेर काढण्यात आले आहे. मात्र बावनदी व सप्तलिंगी पुलांची वाईट अवस्था आहे. हे पुल रहदारीला सुरु असताना त्यावर वाढलेले गवत सुरक्षा कठडय़ांची झालेली दुरवस्थेकडे कोणीही बघत नसल्याचे दिसत आहे.
1910 नंतर ब्रिटीशांनी मुंबईला गोव्याशी जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर †िठकठिकाणी छोटे मोठे पूल उभारण्यात सुरुवात केली. यापैकी तालुक्यातील गडनदीवर आरवली पूल हा 1939साली उभारण्यात आला. त्यानंतर शास्त्राr व सोनवी पुलाची उभारणी करण्यात आली. यातील आरवलीवगळता उर्वरित पुलांची डागडुजी व रंदीकरण करणेही महामार्ग विभागाला जमलेले नाही. सोनवी पूल हा 62 मीटर लांबीचा आहे. त्याची रंदी कमी असल्याने एकाचवेळी एखादे अवजड वाहन गेले तर रिक्षाही सहजगत्या जावू शकत नाही. दोन दिवसापूर्वी एका ट्रकने पुलाच्या रेंलिगला जोरदार धडक दिली. यामुळे या पुलाचे रेंलिग तुटले आहे. डागडुजीअभावी पुलांचा धोका वाढला असताना बांबुच्या काठीच्या सहाय्याने याला संरक्षित देत रेंलिग मजबुत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महामार्गावरील बांबुच्या रेंलिगमुळे या पुलाचा धोका अधिकच वाढला आहे. तर पुलाचे लोंखडी रेलिंगही तुटलेल्या व पडलेल्या अवस्थेत आहे. बावनदी आणि सप्तलिंगी पुलाचीही तीच अवस्था असून महामार्ग 66वरील पुलांची डागडुजी आणि नवीन पुलांचे काम होणार तरी कधी, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.