सुधाकर काशीद/ कोल्हापूर
नवरात्र म्हणजे दुर्गा मातेचा उत्सव जरूर आहे. या काळात नवदुर्गांचे दर्शन ठरलेले आहे. पण मोगलांना जेरीस आणणाऱया व करवीर संस्थांनची गादी स्थापन करणाऱया शिवरायांच्या सुनबाई दस्तुरखुद्द महाराणी ताराराणी यांच्या तख्ताचेही (बैठकीचे आसन) या†ना†मत्ताने आपल्याला दर्शन घडले तर ती या सोहळ्याची नक्कीच वेगळी शान असणार आहे. आणि महाराणी ताराराणीचे हे परंपरागत तख्त या नवरात्रात आपल्याला पाहण्यासाठी आज खुले झाले आहे.
जुन्या राजवाडय़ातील भवानीदेवीच्या मंदिरात भवानीच्या दर्शनाबरोबरच मराठा इतिहासातील ताराराणी या दुर्गेच्या तख्ताचेही दर्शन घेता येणार आहे. भवानी मंडपात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी व करवीर गादीचे तख्त भवानीदेवीच्या लगतच व्हरांडय़ात आहे. यातील छत्रपती शिवाजी व करवीर गादीचे तख्त एरवीही पाहता येते. पण महाराणी ताराराणीचे तख्त नवरात्राच्या आजच्या पहिल्या दिवसापासून फक्त नऊ दिवसच खुले असते व या काळातच त्याचे दर्शन घेता येते. खुद्द ताराराणी यांचे तख्ताच्या माध्यमातून दर्शन या नवरात्राला लाभलेली एक ऐतिहासिक किनार मानली जाते.
महाराणी ताराराणींनी करवीर संस्थांनची गादी स्थापन केली. पहिल्यांदा राजधानी पन्हाळ्यावर होती. त्यानंतर राजधानी कोल्हापुरात आली. ताराराणींनी आपल्या शौर्याचा एक वेगळा इतिहास घडवला. औरंगजेबासारख्या ताकदवान सरदाराला अक्षरशा जेरीस आणला. एक महिला किती धीराची, किती शौर्याची प्रतीक असू शकते याचे प्रतीक ताराराणीच्या इतिहासाचा हा सारा कालखंड राहिला.
या ताराराणींनी आपल्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे तख्तही आणले. ते आजही भवानी मंडपात आहे. ताराराणीच्या पश्चात त्यांचेही तख्त ठेवले आहे. शिवरायांच्या तख्तावर एरवी नेहमी भगवी चादर असते. नवरात्राच्या वेळी ते सन्मानपूर्वक खुले केले जाते. ताराराणीचे तख्त मात्र परंपरेनुसार नवरात्रात नऊ दिवसच दर्शनासाठी खुले असते. साक्षात ताराराणी या दुर्गेचा स्पर्श झालेल्या या तख्ताचे दर्शन घडणे हे या नवरात्रातले जरूर एक वेगळेपण ठरू शकते.
अलीकडच्या काळात नवरात्राचे स्वरुप बदलले आहे. लखलखाट, झगमगा टात आता मूळ नवरात्र हरवला गेला आहे. गरबा-दांडिया, सहलीच्या सहली काढून नवदुर्गाचे दर्शन, नवदुर्ग दर्शनासाठी वेगवेगळे प्रायोजक, चौकाचौकात मूर्तिपूजा, मिरवणुका असे त्याला उत्सवी स्वरूप आले आहे. आा†ण या उत्सवाच्या माहोलात शिवराय, ताराराणीचे तख्त पाहायला आपल्याला कोठे सवड आहे. सोहळा हे वास्तविक दुर्गेचे साक्षात रूप म्हणजेच महाराणी ताराराणी आहेत. आणि या ताराराणीचे मूळ तख्त आजही डोळे भरून पाहण्याची संधी आपल्याला आहे.
भवानी मंडपातील हे तख्त भवानी देवीच्या गाभाऱयाच्या बाहेरच्या बाजूस राजर्षी शाहू छत्रपतींच्या उभ्या पुतळ्याजवळ आहे. तेथे 24 तास समई लावलेली असते. शिवरायांचे तख्त कायम भगव्या चादरीखाली झाकलेले असते. ताराराणीचे तख्त मात्र नवरात्रापुरते खुले असते. सकाळी त्याची विधिपूर्वक पूजन करण्यात आली. नवरात्राच्या काळात येणाऱया भाविकांनाही या तख्ताच्या दर्शनाची माहिती देण्याची गरज आहे. कारण छत्रपती शिवराय व महाराणी ताराराणी यांचे तख्त पाहायला मिळणे हा खूप दुर्मिळ क्षण आहे.
या तख्तांना राजघराण्याच्या विविध कार्यक्रमात आज ही महत्त्वाचे स्थान आहे. सर्व विधींच्यावेळी राज घराण्याकडून या तख्ताला मुजरा, वंदन करूनच पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. राजघराण्यातील राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी या तख्ताचेच पूजन करण्याची प्रथा आहे. छत्रपती शहाजी ट्रस्टच्यावतीने या तख्तांची देखभाल केली जात असल्याचे व्यवस्थापक धनाजी खोत यांनी सांगितले.