ऑनलाईन टीम / मुंबई :
सुशांत प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ते म्हणाले, सुशांत प्रकरणाआड मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. भाजपाने बदनाम करणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
- देवेंद्र फडणवीस गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का ?
पुढे ते म्हणाले, बिहार निवडणुकीमुळे सुशांत प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. बिहारचे पोलीस प्रमुख जे होते, ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. मग आता देवेंद्र फडणवीस गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच सीबीआयने तपास सुरू आहे, त्यांनी लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर केला, तर सुशांत सिंह प्रकरणमधील तथ्य बाहेर येईल, असेही अनिल देशमुख म्हणाले आहेत.