प्रतिनिधी / उस्मानाबाद
महाराष्ट्रावर मोठे आर्थिक संकट आले असून अशा प्रकारचे इतिहासामध्ये आर्थिक संकट कधी नव्हे ते उभा ठाकले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज काढावे लागणार असून त्यासाठी कर्जरोखे घ्यायला महाराष्ट्राने सुरुवात देखील केली आहे. परंतू या कोणत्याही परिस्थितीत लोकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही कर्ज काढून शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपाची मदत करणारच असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१९ ऑक्टोबर रोजी केले.
तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, उस्मानाबाद सह राज्याच्या इतरही जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकट आहे याची जबरदस्त किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे अनेक जिल्ह्याची माहिती घेतली असून एक व जमीन खरडून वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे अलीकडच्या काळात पीक पद्धतीत बदल झाला असून सोयाबीन या अतिवृष्टीमुळे कुठली आहे या जिल्ह्याचा अभ्यास केला असता दर एक दोन वर्षाला उसाचे पीक काढावी लागत आहे. मात्र, यापुढील काळात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज असून कारखानदारांनी लवकर कारखाने सुरू केले पाहिजेत त्यांनी या भागातील ऊस गाळपासाठी नेण्यात प्रयत्न करणे आवश्यक आहे उसाचे नुकसान भरून दिले जाऊ शकत नाही. बांध, बंदिस्ती फुटले असून ते शेतकऱ्यांना दुरुस्त करणे अशक्य आहे. रस्ते वाहून गेल्यामुळे गाव पातळीवरचे रस्ते देखील उध्वस्त झाले आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी मोठी गुंतवणूक करणे आवश्यक असून यावर मार्ग काढण्यासाठी धोरणे आहेत असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचा पिक विमा भरण्याकडे कल वाढला असून ही चांगली बाब आहे मात्र विमा कंपनीच्या काही ही किचकट अटी असून त्यामध्ये शिथीलता आणण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.