ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात मंगळवारी ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या आठ रुग्णांची पुष्टी झाली. त्यामधील सात रुग्ण मुंबईतील तर एक रुग्ण वसई-विरारमधील आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांची संख्या 28 वर पोहचली आहे. मात्र, यामधील ओमायक्रॉनचे 9 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 56 झाली आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावित राज्य आहे. त्यानंतर राजस्थान 13 प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय गुजरात (4), कर्नाटक (3), केरळ (1), आंध्र प्रदेश (1) आणि दिल्ली येथे (6) प्रकरणे आहेत. नवीन प्रकारातून वाढत्या संक्रमणामुळे सरकारची चिंताही वाढली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकार या धोकादायक प्रकाराला सामोरे जाण्यासाठी बूस्टर डोसवर वेगाने काम करत आहे.