ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 2,886 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 20 लाख 00 हजार 878 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 634 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 3,980 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 19 लाख 03 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 45 हजार 622 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 95.13 % आहे. मृत्यू दर 2.53 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 40 लाख 19 हजार 188 नमुन्यांपैकी 20 लाख 00 हजार 878 (14.27 %) रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 2 लाख 12 हजार 023 क्वारंटाईनमध्ये असून, 1 हजार 936 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.