ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन बाधित रुग्णांची संख्या अधिक राहिली. गुरुवारी 5,108 नवीन रुग्णांचे निदान झाले तर 4 हजार 736 रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनामुळे गेल्या 24 तासांत आणखी 159 रुग्ण दगावले असून राज्यातील कोरोना मृत्यूंची एकूण संख्या आता 1 लाख 36 हजार 730 इतकी झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 62,52,150 बाधित कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के तर मृत्यूदर 2.12 % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,30,48,070 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,42,788 (12.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात 2,93,147 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 2,334 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.