प्रतिनिधी / सोलापूर
गेल्या 23 दिवसापासून शेतकरी लढ्याच्या मैदानात अविरतपणे उरतलेला आहे. सरकार आंदोलनावर दमनशाही चालवली आहे. यात तब्बल 20 शेतकरी शहीद झाले, आणि संत बाबा राम सिंग यांनी आत्मा आहुती दिली. त्यांचे बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून 5 हजार शेतकरी दिल्लीकडे आगेकूच झालेले आहेत. अशी भूमिका सिटूचे राज्यसचिव युसूफ शेख मेजर यांनी व्यक्त केली.
रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सांय 6 वाजता चार हुतात्मा पुतळा येथे माकपच्या नगरसेविका कामिनी आडम यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केले.
यावेळी नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी,सलीम मुल्ला, अशोक बल्ला,विक्रम कलबुर्गी, अनिल वासम, बापू साबळे, नरेश दुगाणे, दाऊद शेख, जावेद सगरी, शंकर म्हेत्रे,अकिल शेख, बाबू कोकणे, किशोर मेहता, आसिफ पठाण,विजय हरसुरे,बाळकृष्ण मल्ल्याळ मल्लेशाम कारमपूरी आदींसह शेकडो कार्यकर्ते अभिवादन करून मौन धारण केले.