ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या पोलीस विभागातील साडेबारा हजार रिक्त जागांच्या भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13 % जागा बाजूला काढण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजावर अन्याय होणार नाही. त्यांच्यासाठी 13 टक्के जागा बाजूला काढण्यासाठी कायदेशीर बाबीही तपास केेेला जाणार आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, खासदार संभाजी राजे यांनी देखील मराठा आरक्षणावरील स्थगिती हटत नाही तोपर्यंत राज्यात भरती करू नये अशी मागणी केली आहे. ते म्हणाले होते, भरतीला विरोध नाही पण टायमिंग चुकले, असे ही त्यांनी म्हटले आहे.