राज्यशासनाचा मोठा निर्णय
ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या बदलत्या स्वरुपानुसार राज्यात वेगेवेगळी ध्येय धोरणे अवलंबली जात आहेत. लहान मुलांच्या टास्क फोर्ससाठी तज्ज्ञांच्या मदतीने राज्य शासन सातत्याने पाठपूरावा करत आहे. कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांचे ही कौतूक होत आहे.
आता कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने एक निर्णय घेतला असून या निर्णयानूसार ज्या ज्या जिल्ह्यात कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण आहे. त्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णनांना होम आसोलेशनचा पर्याय संपूर्ण बंद करण्यात आला आहे. अशा रुग्णांना प्रामुख्याने रुग्णालयात दाखल होत, उपचार घ्यावे लागणार आहे. त्यात या निर्णयाला पुण्याचे महापौर यांनी ही विरोध केला आहे.
ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांना घरी उपचार घेता येणार नाही
राज्यातील सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर हे जिल्हे रेड झोनमध्ये असल्याने या जिल्ह्यांना असा पर्याय उपलब्ध असणार नाही. या राज्यातल्या कोरोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिल्याच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.