मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ३१ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात आता पुन्हा वाढ होणार की निर्बंध शिथिल केले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समाजमाध्यमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी संवाद साधणार आहेत. यात मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन संदर्भात काय घोषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील लॉकडाऊन वाढणार असला तरी तो किती दिवसांसाठी वाढणार आहे याबाबत स्पष्टता नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसंच नेमके कोणते निर्बंध शिथील केले जाणार आहेत याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार हे त्यांच्या आजच्या भाषणानंतरच स्पष्ट होईल.
राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ केल्यास लॉकडाऊनचे नियम न पाळता दुकानं उघडू अशा इशारा याआधीच व्यापाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील व्यापारी आणि छोट्या दुकानदारांबाबत सरकार कोणता निर्णय घेतंय याकडे लक्ष असणार आहे.