ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो, असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जाहीर केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलला संपत आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तो महाराष्ट्रपुरता काही आठवडे वाढवला जाऊ शकतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठीण काम आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे. मुंबईत आणि शहरी भागांमध्ये हा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला.