मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला होता. पण कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा सुरु करण्यावर प्रश्नचिन्ह होत. मागील अनुभव पाहता सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारनेही विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली असून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. दुससरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी शाळा सुरु कारण्याविषयी मोठं विधान केलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याने शाळा ठरलेल्या तारखेला सुरु होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. मात्र या १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याने पालक चिंतेत आहेत.
राजेश टोपे यांना १ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, कारण त्याची लागम झालेली कुठे दिसत नाही. त्यामुळे एकदम चिंता बाळगण्याची गरज नाही. शाळा ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरु होईल”, असं म्हटलं आहे.