ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्यात शासनाच्या पणन संचालकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शेतमालाच्या संपूर्ण नियम मुक्तीच्या अंमलबजावणीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या निर्णयानुसार राज्यात आता ‘एक देश एक बाजार’ योजना लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे बाजार समितीच्या आवारा बाहेर होणाऱ्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवर कोणतेही बाजार शुक्ल आकारले जाणार नाही. त्यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व आता कायम राहणार आहे.
आता देशात शेतकरी कुठेही सर्व प्रकारचा शेतीमाल विकू शकणार आहेत. मोठ्या कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करू शकतील.
संपूर्ण नियमनमुक्तीमध्ये व्यापार क्षेत्र म्हणजे कोणतेही क्षेत्र, स्थान, यामध्ये उत्पादनाचे ठिकाण, त्याचा संग्रह आणि गोळा करणे याच्या समावेशासह, कारखाना परिसर, गोदाम, साइलोज, शितगृह किंवा कोणतीही संरचना ठिकाणे, जेथून भारताच्या हद्दीत शेतकरी उत्पादनांचा व्यापार केला जाऊ शकतो असा परिसर असे स्पष्ट केले आहे.