पुणे/प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, राज्यात कायद्याचं राज्य आहे असं संजय राऊत यांनी म्हणतील होतं. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. राज्यात कायद्याचं राज्य आहे तर सरकारने अनिल परब यांना स्वत:हून अटक करावी, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी तीन ट्विट करून संजय राऊतांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे महाराष्ट्र कायद्याचं राज्य असेल तर अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू, असा इशारा पाटील यावेळी पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटलांचं ट्विट…
“महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.” असे संजय राऊत म्हणाले होते, त्यामुळे अनिल परब यांना हे सरकार स्वतःहून अटक करेल अशी शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधातील तक्रार तयार आहे. जर सरकारने स्वतःहून अटक केली नाही, तर आम्ही लवकरच तक्रार दाखल करू !